शांतिगिरी महाराजांनी पेटवली नाशिकच्या समस्यांची होळी

शांतिगिरी महाराजांनी पेटवली नाशिकच्या समस्यांची होळी

शांतिगिरी महाराजांनी पेटवली नाशिकच्या समस्यांची होळी

ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक : नाशिक लोकसभेचे उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या भक्त परिवाराच्या वतीने होळीनिमित्त सर्व नागरिकांसाठी होळी मनोमिलन समारोहाचे आयोजन नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात करण्यात आले होते.

यावेळी भाविकांच्या उपस्थितीत शांतिगिरी महाराजांनी होळीचे पूजन करून नाशिककरांना होळीच्या शुभेच्छा दिल्या, नाशिक जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी, देशात वाढलेली प्रचंड महागाई व बेरोजगारी, लॉजिस्टिक पार्क तयार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, नाशिकची ट्राफिक समस्या व सरकारच्या चुकीच्या धोरणाचे दहन करण्यात आले, बॅनर फडकावून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी देशात भ्रष्टाचार मुक्त सरकार येण्यासाठी राजकारणात स्वच्छ प्रतिमेचे प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन शांतिगिरी महाराज यांनी यावेळी जनतेला केले.

यावेळी नागरिकांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करून नाशिक का खासदार कैसा हो शांतिगिरी महाराज जैसा हो, शांतिगिरी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here