दामपुर येथे श्रमदानातून बांधले वनराई बंधारा
ता.प्रतिनिधी / महेश बुरमवार
मो.न. 9579059379
मुलचेरा – तालुक्यातील दामपुर येथे आज श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता आज गावातील काही तरूण मंडळी एकत्र येत गावालगत असलेल्या नाल्यावर पाणी अडवण्यासाठी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आले..
दामपुर गावात पशुपालन करणारे लोकांची संख्या जास्त आहे. गाई, म्हशी ,शेळी,मेंढी पालन करणारे बहुतांश लोक दामपुर या गावात आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात या पशुना पिण्याची पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते,ही गोष्ट गावातील तरुण मंडळी च्या लक्षात आले.तसेच मुलचेरा तालुक्यातील कृषी सहाय्यक श्री. कौशल्ये सर यांनी बंधारा बांधण्याचे महत्त्व , पाणी अडविणे किती महत्त्वाचे आहे यावर योग्य मार्गदर्शन केले, सरांच्या मार्गदर्शनाखाली गावातीलच काही मित्र मंडळी एकत्र येऊन गावालगत असलेल्या नाल्यावर श्रमदानातून बंधारा बांधण्याचे ठरविले.व श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.त्यामध्ये कृषी मित्र महेश बुरमवार, संदीप बुरमवार,छोटू कुच्छलवार, प्रदिप बुरमवार , महेश बुरमवार,राजेश बुरमवार ,भास्कर बिटपल्लीवार आदी उपस्थित होते…