शिवशाही गणेशउत्सव मित्र मंडळ जांभळीचामाळ गावातील गावाकऱ्यांनी घेतला लाडक्या बाप्पाचा निरोप

70

शिवशाही गणेशउत्स मित्र मंडळ जांभळीचामाळ गावातील गावाकऱ्यांनी घेतला लाडक्या बाप्पाचा निरोप

सौरभ कामडी 

मोखाडा प्रतिनिधी

जव्हार : सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत मधील शिवशाही गणेशउत्सव मित्र मंडळ जांभळीचामाळ “गावात गेली कित्येक वर्षांपासून एक गाव एक गणपती उत्सव परंपरा कायम जोपासली जात असून गणेशोत्सव निमित्ताने दरवर्षी प्रमाणे विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गावाच्या विकासासाठी गावातील नागरिकांचा लोकसहभाग खूप महत्त्वाचं आहे.त्यामुळे लोकसहभाग टिकून राहण्यासाठी सार्वजनिक गणेशोस्तव निमित्ताने शिवशाही गणेशउतव मित्र मंडळ जांभळीचामाळ गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.

यामध्ये लहान मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धां घेण्यात संगीत खुर्ची, गाढवाला शेपूट लावणे,मेणबत्ती पेटविणे,डोळे बांधून मटका फोडी, उकृष्ठ महिलेची व लहान मुलांसाठी निवड करून त्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच सायंकाळी गावातील सर्व कुटुंबातील महिलांनी चूल न पटवता शिवशाही गणेशउत्सव मित्र मंडळ जांभळीचामाळ गणेशोत्सव मंडळ कडून सर्व गावातील कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन स्नेह भोजन महाप्रसाद म्हणून गोड भांडार गाव जेवण करण्यात आले व यामध्ये गोड जिलेबी, पापड, फूलावं भात,पुरी असे अनेक पदार्थ जेवनात दिले

या सर्व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजनासाठी शिवशाही मित्र मंडळ जांभळीचामाळ गणेशोत्सव मंडळ रमेश भरसट,काशिनाथ मोडक,राजू मौळे,एकनाथ मडवी,राजू भोये,विनू दादा मौळे,गणपत दिघा,सुनील चव्हाण,नवजी टोपले,अवेश मोदी, सुरेश शेंडे,चंदर भरसट, दशरत मळेकर, पांडुरंग भरसट,निलेश भरसट, विशाल गावित,अंकुश मोडक, किरण महाले, मौळे,जगदीश गडगे, कुणाल सापटा,ऋतिक दिघा,सागर गावित,राहुल शेंडे,शुभम राऊत,किरण घुटे यांच्या सहकार्याने तसेच गावातील सर्व जांभळीचामाळ महिला बचत गट ,ग्रामस्थ जांभळीचामाळ यांच्या सहकार्याने हे उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. महिलांना व ग्रामस्थांना आदर्श गाव संकल्पना, लोकसहभाग मधून गावचा विकास कसा करू शकतो, तसेच विविध आदर्श गावाची उदाहरणे दिली तसेच महिलांनी स्वतः पुढे येऊन शेती बरो गावातील सर्व महिला,युवक,बालगोपाळ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.