संतप्त शेतकऱ्यांची उपहासात्मक मागणी !
पिकविम्याचे १८०० रुपये बँकेतून काढण्यासाठी पोलीस संरक्षण द्या !
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
भंडारा : राज्यात अलिकडे झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र अक्षरक्ष: दाणादान उडवली आहे. ऐन उन्हाळ्यात आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातली उभी पीके जमीनदोस्त केल्या गेली आहे. तर अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. गेल्यावेळी झालेल्या अवकाळी पावसाच्या नूकसानीतून सावरत नाही तोच आणखी एक तडाखा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे. असे असताना एक आशेचे किरण म्हणून पीक विमा कंपनीकडे शेतकरी आस लावून असतात. मात्र, अस्मानी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडूनही एकप्रकारे थट्टाच केल्याचे बघायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी येथे गेल्यावेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. परिणामी, त्यातीलच एका शेतकऱ्याने या नुकसानी बाबतचा पीक विमा काढला होता. मात्र, पीक विमा योजनेच्या लाभापेक्षा खताची एक बॅग महाग असल्यानं या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. परिणामी, या संतप्त शेतकऱ्यांनी ही मिळालेली रक्कम बँकेतून काढून आणण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं, अशी उपहासात्मक मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
*पिकविम्याचे अठराशे रुपये बँकेतून काढण्यासाठी पोलीस संरक्षण द्या*!
प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षी आलेल्या अवकाळी पावसाचा लाभ देताना चोलामंडलम कंपनीने शेतकऱ्याची चांगलीच बोळवण केली आहे. मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी येथील एका शेतकऱ्याला मिळालेली एक हजार आठशे रुपयांची रक्कम बँकेतून काढून आणण्यासाठी चक्क पोलीस संरक्षण द्यावं, अशी उपहासात्मक मागणी या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. तर, विमा योजनेच्या लाभापेक्षा खताची एक बॅग महाग असल्याने अशा विमा रकमेचं करायचं काय? असा संतप्त सवालही उपस्थित केला आहे. तर एका शेतकऱ्यानं थेट स्वतःच्या खिशातून रक्कम काढून विमा कंपनीला देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.