ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता जनविकास
चे निवेदन
: गजानन देवळे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
मालेगांव: तालुका ओला दुष्काळ जाहीर करणे करीता मालेगांव चे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमनत्राना गजानन देवळे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे , यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी होत आहे त्यामुळे शेतकयांचे फार मोठे नुकसान झाले आहे . आधीच पावसाळा उशीरा सुरु झाल्यामुळे शेतकर व मशागतीचे कामे लांबले होते . त्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अंतोनात नुकसान होत आहे . त्यामुळे मालेगांव तालुक्यात्तील शेतकरी हा अडचणीत सापडला आहे . वाशिम जिल्हयातील मालेगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकन्यांची दुबार पेरणी झाली आहे . बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिके वाहुन सुद्धा गेली असल्याने शेतकऱ्यांनवर संकट कोसळले आहे . मालेगांव तालुक्यात शासनाच्या वतीने सर्वेक्षण व पंचनामे करून अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना योग्य मदत करावी असे निवेदनामध्ये नमूद केले निवेदन देतेवेळी जन विकास आघाडीचे सुरेश जहिरव अशोकराव गवळी वैजनाथ गोंडाळ रामदास बळी
भागवत बळी समदास काटेकर सै.आयुब पप्पू कुटे
अमोल बळी अरुन शर्मा किशोर शिंदे अभी घुगे अतीष बोकन संतोष पाआयुब वीलास बळी प्रमोद सोमाणी मो.जफर निसार खान विनायक काटेकर सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.✍