✍️सचिन पवार ✍️कोकण ब्युरो चीफ/📞8080092301📞

मालवण :-सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्राँझ पुतळा सोमवारी कोसळून पडला होता. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर राज्यभरात एकच गहजब उडाला होता. या दुर्घटनेसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि नौदल यापैकी नेमके कोण जबाबदार आहे, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. तर पोलिसांनी हा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचर इंजिनिअर चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी परखड शब्दांत आपली मतं मांडत सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना नेमकी काय चूक झाली, याबाबत भाष्य केले.

भगवान रामपुरे यांनी म्हटले की, सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा अशाप्रकारे कोसळणे, ही एक कलावंत म्हणून माझ्यासाठी अत्यंत शरमेची आणि मान खाली घालायला लावणारी घटना आहे. जेव्हा पुतळ्याची उंची 15 फुटांपेक्षा जास्त असते तेव्हा शिल्पकारासोबत इंजिनिअरिंगचे काम जास्त महत्त्वाचे असते. पुतळ्यातील स्टीलचे रॉड उत्तम दर्जाचे असावेत. पुतळ्याची उंची जितकी जास्त तितका पाय भक्कम असावा लागतो. 108 फुटी शंकराचार्यांचा पुतळा करताना आम्ही L&T कंपनीसोबत काम केले. या पुतळ्यासाठी 80 फूट खोल पाया खणला होता. उंच पुतळा करताना जमिनीचा सर्व्हे केला जातो. जमिनीत मुरूम किती, खडक किती याचा विचार होतो. भूकंप झाला तर पुतळ्यावर त्याचा परिणाम होऊ नये, याचा विचार केला जातो. भुगर्भमध्ये खडक किती, पाणी किती, हे सर्टिफाय केल्यावरच काम केले जाते. आम्हाला शंकरचार्यांचा पुतळा करताना पाया 500 वर्ष काही होणार नाही याची गॅरेंटी मागितली होती. तज्ञांनी 700 वर्ष काही होणार नाही हे सर्टिफिकेट दिल्यानंतरच काम सुरु करण्यात आल्याचे भगवान रामपुरे यांनी सांगितले.

सर्वात कमी रक्कमेची निविदा भरणाऱ्यालाच सरकारी काम दिलं जातं: भगवान रामपुरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्गातील दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना, वाऱ्याचा जास्त असलेला वेग शिवरायांचा पुतळा कोसळण्यास कारणीभूत ठरला, असे वक्तव्य केले होते. याबाबत भगवान रामपुरे यांनी म्हटले की, जर 45 किलोमीटर वेगाने जर वारे वाहत असतील तर त्याचा विचार आधीच व्हायला हवा होता. चूक केवळ शिल्पकारची नाही, शासकीय कामात निविदा मागवतात, जी रक्कम सर्वात कमी त्याला काम देतात. कामाचा दर्जा न पाहता केवळ रक्कम कमी किती हे पाहिलं जातं, म्हणून मी महापालिकेचे काम करायचे नाहीच हे ठरवले आहे.2003 साली मी सोलापुरात झाशीच्या राणीचा पुतळा केला. दोन पायावर असलेला हा पुतळा असून ही इतके वर्ष टिकून आहे. नंतर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही केला. मात्र बिल देताना पालिकेत अनेक टेबलवर कमिशन मागण्यात आली. या घटनेत ही तेच असण्याची शक्यता आहे, शंभर टक्के यात भ्रष्टाचार झाला असेल. या घटनेला शासनही तितकंच जबाबदार आहे, असे भगवान रामपुरे यांनी म्हटले.सरकारला नेहमी कमी वेळेत पुतळा उभारायची घाई असते: भगवान रामपुरे भगवान रामपुरे यांनी सिंधुदुर्गाती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनुभवी कलाकाराची निवड करणे गरजेचे होते, असे म्हटले. चार-पाच महिन्यात पुतळा करा, आमचे साहेब येणार आहेत उदघाट्नला, निवडणूक आहे त्यात जाहिरात करता येईल, असं म्हटले जाते. कुठलंही शासन असलं तरी हे होतच. उद्घाटनाची वेळ आधी ठरलेली असते आणि त्या वेळेत काम करण्यासाठी घाई होते. चांगले कलावंत हे कमी पैशात उपलब्ध होत नाही, त्यासाठी वेळ देणे हे तितकेच महत्वाचे असल्याचे मत भगवान रामपुरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here