मौजा देव्हाडी येथील भव्य सेवक सम्मेलन, जागरण, भजन, व सामुहिक हवन कार्य संपन्न.

बाहुली परमात्मा एक सेवक मंडळ देव्हाडी तर्फे आयोजित केलेल्या मानव धर्म प्रचार प्रसार व जन जागृती अभियान सोहळा

मौजा देव्हाडी येथील भव्य सेवक सम्मेलन, जागरण, भजन, व सामुहिक हवन कार्य संपन्न.

भवन लिल्हारे
मोहाडी तालुका पत्रकार
📱८३०८७२६८५५
📞८७९९८४०८३

मोहाडी :- भंडारा जिल्हा, मोहाडी तालुका, येथील देव्हाडी येथील बाहुली परमात्मा एक सेवक मंडळ यांच्या वतीने दिनांक २५ फेब्रुवारी सन २०२२ रोज शुक्रवारला ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत मानव जागृती, धर्म रक्षण, सामाजिक विकास, व्यसनमुक्ती आणि अंधश्रध्दा या पासुन मुक्त करुन गोरगरीब दुःखी कष्टी गरीब मानवास मार्गदर्शन करणारे मानव धर्माचे संस्थापक महंत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने भगवत प्राप्तीचा परिचय करून देणारे व सर्व वाईट व्यसनातून मुक्त करुन सुखमय जिवन जगण्याची प्रेरणा देणारे मानव धर्माचे प्रचार व प्रसार निमित्त सामुहिक हवन कार्य व सेवक सम्मेलन सोहळा पार पडले.

या मानव धर्माच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी चे अध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारीका म्हणुन लाभलेले उद्घाटीका सौ. लताबाई दिलीप बुरडे ( ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) अध्यक्ष मा.श्री.यशवंतरावजी ढबाले गुरुजी ( ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे मा.श्री.नरेश भाऊ सव्वालाखे ( उपाध्यक्ष सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री. मोरेश्वर सार्वे ( सचिव सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री. कंठीरामजी पडारे ( कोषाध्यक्ष सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.राजकुमार पिल्हारे ( सहसचिव सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.रविकुमार मरस्कोले ( संचालक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री. गुरुभाऊ शेंडे ( संचालक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री. राजु भाऊ माटे ( संचालक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री. एकनाथजी जिभकाटे ( संचालक सेवक मंडळ मोहाडी.) मा.श्री. नत्थुजी कोहाड ( संचालक सेवक मंडळ मोहाडी,) मा.सौ.सरस्वताबाई माटे ( संचालिका सेवक मंडळ मोहाडी) मा.श्री विजयजी दमाहे ( ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी चे स्टार प्रचारक ) मा.श्री. सदारामजी लिल्हारे ( ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मांडेसर ) हे उपस्थित होते.

हे आपण वाचलंत का?

 

ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत येणारे बाहुली परमात्मा एक सेवक मंडळ देव्हाडीचे आयोजक मंडळाचे मा.श्री. राजकुमारजी माने ( अध्यक्ष ) मा.श्री. राकेश लिल्हारे ( सचिव ) मा.सौ. शालुताई प्रकाशजी निंबार्ते ( उपाध्यक्ष ) मा सौ. लक्ष्मीबाई अजयजी दमाहे ( सहसचिव ) मा.सौ.संगीता गजाननजी नेरकर ( कोषाध्यक्ष ) मा.सौ. आशाताई श्रीरामजी दमाहे ( संचालिका ) मा.सौ.सुनीता रामलालजी बिरनवारे ( संचालिका ) मा.सौ. अंजुराताई राजुजी सव्वालाखे ( संचालिका ) मा.सौ. वर्षाताई दिनेशजी दमाहे ( संचालिका ) मा.सौ. प्रीयंकाताई उमेशजी मसरके ( संचालिका ) मा.सौ.लताताई नारायणजी मेश्राम ( संचालिका ) या आयोजक मंडळांनी सकाळी ४:०० वाजे गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबविले, व परिसर स्वच्छ केला व रांगोळी काढली. सकाळी ८:३० वाज. सामुहिक हवन कार्य संपन्न केले.

सकाळी ९:३० ते ११:३० वाजता हनुमान झाकी, शोभायात्रा काढण्यात आली. व दुपारी १२:०० ते १:०० आलेले सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. व दुपारी १:१० वाजता स्वागत गीत डान्स या माध्यमातून सादर करण्यात आले. कु. साक्षी दिलीप बिरणवारे व त्यांचे सहमैत्री यांनी.

दुपारी १:२० ते ३:५५ वाजता महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या शिकवणीवर चर्चा बैठक झाली.
भगवंताची प्राप्ती करून वाईट विचारांचा नायनाट होते, वाईट भावनांचा नाश होतो, अशा बाबांचा आणि सेवकांचा अत्मनुभव आहे, म्हणुन या मार्गामध्ये लोकांची धाव आहे. मार्गामुळे दुष्ट भावनेचा आणि अंद्धश्रद्धेचा नाश होतो. जीवनाची अनेक पुजा बंद करून मनाची एकाग्रता, एक चित्त,एक लक्ष, एक परमेश्वर आहे, असे बाबाने शिध्द केले आहे, काही स्वार्थी लोकांनी मानवाच्या मनात शंकाकुशंका निर्माण करुन लोकांच्या मनात भिन्न भिन्न विचार निर्माण केले आहे. त्या कारणाने आत्मशक्ती आणि आत्मबल कमजोर झाले आहे, म्हणुन मानवी जीवनात मनाची एकाग्रता हाच परमेश्वरी प्रवाह मानवामध्ये तयार होतो, व तोच प्रचिती देतो, आत्मशक्ती वाढवितो, शंकाकुशंका नष्ट होतात, आणि आत्मबल वाढते आणि भगवंत परमेश्वर हा आपल्या जवळ राहतो, आणि मानव आपले भविष्य उज्ज्वल करतो. असे आलेल्या पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.

https://www.instagram.com/p/CaUf3bxK98d/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.

सत्य बोला, मर्यादा पाळा, प्रेमाने वागा, राग आणणे बंद करा,शब्द पाळा, निंदा करू नका, दारु पिऊ नका, धिंगाणा करु नका, जुगार खेळू नका, वाईट व्यसन बंद करा, उसनवारी करु नका,अंथरूण पाय पसरा, स्वावलंबी बना, अड्यामार्गाने श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करु नका, दुसऱ्यांच्या आत्म्याला दुखावू नका, एकच भगवंत माना, बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करा, हि चर्चा बैठक एक भक्ती आहे, महानत्यागी बाबा जुमदेवजी ने भगवंताच्या प्रप्तिकरिता निष्काम कर्मयोग साधवन्याकरिता जे चार तत्व, तीन शब्द, पाच नियम, दिले आहे त्याचे आचरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे आयोजक मंडळाचे संपुर्ण कार्यकर्ते व कार्यक्रमाचे सुत्र संचालन करणारे मानव धर्माचे सेवक श्री विजयजी बिरणवारे यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले, व महाप्रसाद वाटप करुन स्नेहभोज देऊन कार्यक्रम संपविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here