शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून नदीत उडी मारुन आत्महत्या

यवतमाळ :- उमरखेड तालुक्यातील भोजनगर येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून पैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. वसंता चंदू राठोड 45 रा. भोजनगर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दोन एकरात कपाशीची पेरणी केली होती. त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यामुळे डोक्यावर कर्ज झाले. या विवंचनेत 23 डिसेंबरला ते घरातून निघून गेले. शनिवारी सकाळी पैनगंगा नदी पात्रात त्यांचा मृतदेहच आढळला. पोलीस पाटील वंदना राठोड, तलाठी ताई दवणे, कोतवाल वासुदेव जुकोटवार यांच्या उपस्थितीत मच्छीमारांनी मृतदेह बाहेर काढला. कर्जबाजारीपणामुळे वसंता राठोड यांनी  आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे पाच मुली, दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. बिटरगाव पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here