बोट दुर्घटनेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली

51
बोट दुर्घटनेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली

बोट दुर्घटनेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली

बोट दुर्घटनेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली

नाताळाच्या सुट्टीत जलपर्यटनाकडे पाठ; बोट चालक व स्थानिक व्यावसायिक चिंताग्रस्त

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:नाताळाच्या सुट्टीत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटकांची पावले ही कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्याकडे व मुंबई शहर तसेच अलिबाग मुरुड येथील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी वळतात. मात्र, नुकतेच (दि.18) घारापुरी बेटाकडे प्रवाशांना घेऊन जाणार्‍या निलकमळ या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे नाताळाच्या सुट्टीत या दुर्घटनेचा फटका हा अलिबाग, मांडवा बंदर आणि घारापुरी बेटाकडे जाणार्‍या जलपर्यटनाला बसला असून, स्थानिक व्यावसायिक आणि बोट चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यात घारापुरी बेट उर्फ लेण्यांचे शहर म्हणून घारापुरी (एलिफंटा) बेटानी आपल्या नावाची ओळख ही देश-विदेशातील हजारो पर्यटकांच्या हृदयात निर्माण केली आहे. त्यामुळे मुंबई, कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे हजारो पर्यटकांची पावले ही दरदिवशी आपापल्या कुटुंबासह पर्यटन स्थळा कडे वळतात. याचा फायदा हा कोकणातील, गोरगरीब व्यावसायिकांना तसेच बोट चालकांना होत असतो. मात्र, बुधवारी (दि. 18) मुंबई शहरातून घारापुरी बेटाकडे प्रवाशांना घेऊन जाणार्‍या निलकमळ या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे नाताळाच्या सुट्टीत या दुर्घटनेचा फटका हा अलिबाग, मांडवा बंदर आणि घारापुरी बेटाकडे जाणार्‍या जलपर्यटनाला बसला असून, स्थानिक व्यावसायिक आणि बोट चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोट दुर्घटनेमुळे आम्ही कुटुंब घाबरून न जाता नाताळाच्या सुट्टीत अलिबाग येथे आलो आहोत. परंतु, अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने, बोट चालकांनी खबरदारी घेऊन शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. अलिबाग मुरुड येथील निसर्गसौंदर्याचा आनंद वेगळाच अनुभवास मिळत आहे.
प्रेषिता मसुरकर
पर्यटक मुंबई

बोट दुर्घटनेचा फटका काही अंशी स्थानिक व्यावसायिकांना बसला असला तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षात निश्‍चित हजारो पर्यटकांची पावले ही अलिबाग,मुरुड व तेथील समुद्रकिनारा,किल्ला, मंदिरे पाहण्यासाठी व येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी ये-जा करतील.
यशवंत हरेर
हॉटेल व्यवसायिक