लाकडे होळीत जाळण्यापेक्षा झाडांना पाणी घालून होळी साजरी करा :संदीप आदे,शहर अध्यक्ष नेफडो.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा 28 मार्च:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने विविध प्रसंगाच्या नीमीत्याने व्रुक्षारोपन केलेल्या झाडांना पाणी टाकून होळी चा उत्सव ” होलीकोत्सव” साजरा करण्यात आला.
यावेळी बोलतांना संदीप आदे यांनी होळी ला झाडांची मोठ मोठी लाकडे जाळून पर्यावरणाला हानी पोहचवीन्या ऐवजी व्रूक्षाना पाणी टाकून होळी साजरी करावी आणि पर्यावरणाच्या संवर्धना करीता सहकार्य करावे असे आवाहन केले. या उपक्रमात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, जिल्हा संघटक विजय जांभूळकर, महिला तालुका अध्यक्षा अल्का सदावर्ते, उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते, शहर अध्यक्ष संदीप आदे, शहर संघटक उमेश लढी, वर्षा कोयचाडे, गीता संतोष मानगुडदे आदिंची प्रामुख्याने उपस्थिति होती. राजुरा शहरातील आसीफाबाद रोड कडील रेल्वे क्रोसिँग परिसरातील अनेक झाडांना पाणी टाकण्यात आले. तसेच वर्षा कोयचाडे यांच्या हस्ते व्रूक्षारोपन करण्यात आले.उपस्थित नेफडो सभासदांनी गेल्या वर्षभरात केलेल्या व्रूक्षारोपनातील झाडांना जगवीन्याचा संकल्प घेतला.