वाढत्या तापमानामुळे चार जणांचा मृत्यू
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
नागपूर .नागपुरात कडाक्याच्या उन्हामुळे तापमानात भीषण वाढ झाली आहे हवामान विभागाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेचे लाटेचा अलर्ट दिला आहे. यात नागपूरचा ही समावेश आहे. वाढत्या तापमानामुळे शहरात उष्माघाताने चार जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. नागपुरात उष्माघातांचे चार बेघरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कळमना, जुनीकामठी, आणि पाच पावली पोलिसांच्या हद्दीत चार जणांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली. उन्हामुळे या बेघरांच्या मृत्यू झाल्याची संशय आहे. दरम्यान, मनपाच्या ऑडीटनंतर यांच्या मृत्यूच्या कारणावर चर्चा करून अहवाल आल्यावर उष्णघातांमुळेच हा मृत्यू झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल.
दरम्यान नागपूरच्या उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेच्या ट्रांसफार्मरला आग लागू नये म्हणून कुलर लावण्याची वेळ आली आहे महावितरण विभागाकडून विजेच्या ट्रांसफार्मरला कुलर लावले आहेत.