गणेशोत्सव-2024 रायगड जिल्हा शांतता समिती बैठक संपन्न; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे (जिल्हाधिकारी किशन जावळे)

गणेशोत्सव-2024 रायगड जिल्हा शांतता समिती बैठक संपन्न; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे (जिल्हाधिकारी किशन जावळे)

गणेशोत्सव-2024 रायगड जिल्हा शांतता समिती बैठक संपन्न; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे (जिल्हाधिकारी किशन जावळे)

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

रायगड:-जिल्ह्यात 1 लाख 3 हजार 24 खासगी तर २७४ सार्वजनिक मंडळाचे गणपती गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क राहावे.

दि.30 जिल्ह्यात दि. ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ३ हजार २४ खासगी तर २७३ सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार आहेत. कोकणातील गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाहनांची वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
गणेशोत्सव-२०२४ शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक गृह विभाग पांडूरंग गोपणे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सा.बा.वि.अलिबाग जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य,पत्रकार उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, जिल्ह्यात गणेश उत्सवाची पूर्वतयारी जोरात सुरू असताना प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राखणे, गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे, कोकणामध्ये खास गणवेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करणे या दृष्टीने सतर्क आहे.

गणेश भक्तांचा प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुविधा केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी,अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच या ठिकाणी सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंन्द्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असावी. वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओ.आर.एस. आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसाचे १७ सप्टेंबर २०२४ रोजी आणि २१ दिवसाचे गणपती २७ सप्टेंबर २०२४ रोजी यानुसार विसर्जनाचे दिवशी होईल. यासाठी सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. यातील समुद्रावर ५२ गणेशमुर्ती विसर्जन, खाडीमध्ये १०५ गणेशमुर्ती विसर्जन, नदीमध्ये २४४ गणेशमुर्ती विसर्जन, तलावामध्ये १०० गणेशमुर्ती विसर्जन व इतर ठिकाणी ९४ गणेशमुर्ती विसर्जन होणार आहे .
दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे. जिल्हयात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असून विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्याकरीता पोलीस ठाण्याच्या हददीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागास दिले. तसेच गणेशोत्सव कालावधीत विद्युत विभागाने वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची विद्युत विभागाने दक्षता घ्यावी असे सांगितले. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत साडे चार हजार बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, दि.७ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सव काळात राज्याच्या विविध ठिकाणांहून चाकरमाने कोकणात आपल्या गावी मोठ्या संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. ७ व ८ शनिवार व रविवार आल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणपती उत्सवादरम्यान जिल्हयात पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या कालावधीत दहशतवादी कारवाई रोखण्यासाठीएटीबी व एटीसी चे पथक नेमण्यात आले असून सोशल मिडीया देखरेख करण्याकरीता सायबरसेल सतर्क आहे. प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शांतता कमिटी बैठका मोहल्ला कमिटी बैठका घेतल्या आहेत. मंडळ बैठका,गावभेटी, दंगाकाबू पथकाने रंगीत तालीम, रुट मार्च करण्यात येत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचे आदेश
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. १६ टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास / मुर्तीचे आगमन दि. 05 सप्टेंबर २०२४ रोजी 00.0१ वाजेपासून ते दि. 0८ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.6६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णतः बंद राहील.
0५व 0७ दिवसांच्या गणपतीचे विर्सजन/गौरी गणपती विसर्जन/काही अंशी परतीचा प्रवास- दि.११ सप्टेंबर रोजी ८.00 वाजेपासून ते दि.१३ सप्टेंबर रोजी रात्री ११.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
अनंत चुतर्दशी ११ दिवसांचे गणपती विसर्जन/परतीचा प्रवास- दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.00 वाजेपासून ते दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री २०.०० वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता १६ टन किवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक,मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णतः बंद राहील.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर संपूर्ण प्रवास बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत अशी वाहने, ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे. (जड-अवजड, मल्टीएक्सल, ट्रेलर, ट्रक्स, लॉरी) अशा वाहनांना दि.०८ सप्टेंबर रोजी २३.०० वाजेपासून ते दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० वा.पर्यंत व दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री २३.०० वाजेपासून ते दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० वा. पर्यंत या वेळेत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहने दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री २०.०० वाजेनंतर नियमित प्रवास करतील.

वरील निर्बंध जेएनपीटी बंदर व जयगड बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, तसेच दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रुंदीकरण / रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here