महाराष्ट्र कोरोना वायरस: माघील 24 तासात 1 हजार 130 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले, 26 जणाचा मृत्यू.

प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348
महाराष्ट्र:– महाराष्ट्र राज्यात माघील 24 तासात 1 हजार 130 नवीन कोरोना वायरस बाधित रुग्ण समोर आले आहे. तर 26 कोरोना वायरस बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर 2 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 64 लाख 49 हजार 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के आहे. महाराष्ट्र राज्यात माघील 24 तासात 26 रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर 2.12 टक्क्यांवरच स्थिर आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के इतके असून आतापर्यंत एकूण 64 लाख 49 हजार 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 1 लाख 67 हजार 64 होम क्वारंटाईन आहेत. तर,  तर, 897 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात काल 1 हजार 338 रुग्ण आढळून आले होते. तर, 1 हजार 584 इतकी होती. याशिवाय, 36 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

दुस-या लाटेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या समोर आली होती. त्यात आता प्रमाण खुप कमी असल तरी लवकरच राज्यातील रुग्णसंख्या पूर्णपणे अटोक्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोना वायरसच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाकडून महत्वाची पाऊले उचलली आहे. सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात येत असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. यातच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येत घट होत असून राज्याचे कोरोना मुक्तच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. लवकरच राज्यातील रुग्णसंख्या पूर्णपणे अटोक्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here