डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करू दया, वंचितचे नेते डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.
✒ प्रशांत जगताप ✒
हिंगणघाट,दि.31 मार्च:- कोरोना वायरस मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदी मुळे गरिब, कामगार, मजूर, ठेलेवाले, टपरीवाले यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. दोन वेळेचे जेवन मिळनेही आज गरिबांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. आणि केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन गरिब लोकांनसाठी कुठलीही उपायोजना न करता कोरोनाचा नावाखाली फक्त कडक निर्बंध लादण्यात धन्यता मानत आहे.
तम्माम संविधान प्रेमी, कोरोडो दबलेल्या जनतेचे प्रेरणानायक, सामाजिक राजकिय, आर्थिक क्रांतीचे क्रांतीस्तंभ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल ला कोरोडो जगवाशी मोठ्या उत्साहात साजरी करत असते. पण कोरोना वायरसच्या महामारीने 2020 ला शासनाने लावलेल्या लॉकडाउन मुळे जयंती साजरी करण्यात आली नव्हती. महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनची जयंती संपुर्ण जगात म्हणवीली जाते. सध्या पाच राज्यात निवडणुका सुरु आहेत, तिकडे लाखोच्या सभा होत आहे. तिकडे कोरोना दिसत नाही का? भारतात वेगवेगळ्या स्टेडीयम मध्ये मॅच खेळत आहे तिते पन हजारो लोकं मॅच बघायला येत आहे तेथे कोरोना दिसत नाही काय? आणि डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती साजरी करण्यासाठी नियम का?
14 एप्रिल हा दिवस सर्व भारतीय लोकांनसाठी अभिमानाच्या दिवस आहे. जाच्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो. त्या महामानवाच्या जयंती निमित्त या वर्षी 14 एप्रिलला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करु देण्या करीता आज दि. 31 मार्च रोजी पिपल्स वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष व वंचितचे नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनीष कांबळे, वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश खानकूरे, शहर अध्यक्ष दिलीप कहूरके, जिवन उरकुडे, महेश लोहकरे, चारू आटे, प्रशांत शंभरकर, विशाल थुल, किशोर लढे, देवेंद्र त्रिपल्लीवार, रसपाल शेदरे संतोष सहारे, कुडलिक भजभूजे, गणेश कावळे, केशव सहारे, नितिन मैदलकर हे उपस्थित होते.
डॉ. उमेश वावरे (वंचित बहूजन आघाडी चे नेते)
गरिबाची छळ करणा-या आणि गरिबाना अंधारमय खाईत घालणा-या या सरकारला महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्या शिवाय गप्प बसणार नाही. महापुरुषाची जयंती साजरी न करु देण्या-या सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे.