वर्धा जिल्हात संचारबंदीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज..

63

वर्धा जिल्हात संचारबंदीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज..

वर्धा जिल्हात संचारबंदीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज..
वर्धा जिल्हात संचारबंदीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज..

✒️आशीष अंबादे,प्रतिनिधी✒️
वर्धा,दि15 एप्रिल:- महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना वायरस बांधीत रुग्णांमुळे महाराष्ट्र शासनाने संपुर्ण राज्यात 14 एप्रिल रात्री 8 वाज्यापासून संपुर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

वर्धा जिल्हात कोरोनाचा वाढत आलेख बघता जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलातर्फे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता 90 पोलीस अधिकारी 700 पोलीस कर्मचारी तर गृहरक्षक दलाचे 500 जवान तैनात करण्यात आले आहेत.

काय सुरु, काय बंद
● सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुर
● कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार
रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार
● लॉकडाऊन सदृश्य निर्बंध आहेत- रात्री 8 वाजल्यापासून अंमलबजावणी
● रात्रीपासून ब्रेक द चैनसाठी राज्यात संचारबंदी
● पुढील 15 दिवस संचारबंदी
● येणे जाणे पूर्ण बंद
● आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही
● अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
● सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार 
● त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार
● वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
● शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील
● बँका, आर्थिक संस्था, अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार
● बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट
● हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार
● रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार
​● लाभार्थीना 3 किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत