वर्धा जिल्हातील अल्लीपुर मध्ये मुलाने केली बापाची हत्या.
वर्धा जिल्हातील अल्लीपुर मध्ये मुलाने केली बापाची हत्या.

वर्धा जिल्हातील अल्लीपुर मध्ये मुलाने केली बापाची हत्या.

वर्धा जिल्हातील अल्लीपुर मध्ये मुलाने केली बापाची हत्या.
वर्धा जिल्हातील अल्लीपुर मध्ये मुलाने केली बापाची हत्या.

✒प्रशांत जगताप कार्यकारी संपादक✒
वर्धा,दि.2 मे:- वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथे एका मुलाने जन्मदाता वडीलांची हत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल्लीपुर क्षेत्रातील पवनी येथे राहणा-या एका परीवारात घरगुती वाद अगदी विकोपाला जावून मुलाने काडीने डोक्यावर जबर वार करुन जन्मदात्या वडीलांची हत्या केली. ही घटना अल्लीपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या पवनी या गावात घडली आहे. सुरेश गवळी वय 52 वर्ष असे मृताचे वडीलाचे नाव आहे.

पवनी येथे राहणारे सुरेश गवळी व त्याचे कुटुंबीय मोल मजुरीचे काम करून आपल्या उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वी मृतक सुरेश गवळी याचा अपघात झाला. अपघात झाल्या पासुन ते घरीच राहत होता. सुरेश घरी असल्यामुळे परीवाराची सर्व जबाबदारी त्यांचा पत्नीवर आली, ती रोजमजुरीचे काम करून सुरेशची पत्नी कुटुंबाचे पालन-पोषण करते. काही वर्षांपूर्वी सुरेशच्या मूलीचे लग्न झाले. मुलीच्या लग्नानंतर सुरेश, सुरेशची पत्नी व मुलगा आदीत्य तिघे एकाच घरात रहायचे. अशातच रविवारी दुपारी कौटुंबिक कारणावरून आदित्य आणि सुरेश यांच्यात वाद झाला. याच वादादरम्यान आदित्य याने जवळ असलेल्या काठीने सुरेशच्या डोक्यावर जबर प्रहार केला. यात सुरेश याचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे आदित्य याला दारूचे व्यसन लागले होते. अशातच दारूच्या कारणावरून आदित्य आणि त्याच्या कुटुंबियांत नेहमी खटके उडत होते. या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आदीत्य गवळी वय 21 वर्ष याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. मिश्रा, स्वप्नील भोजगुडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here