तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा; आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिध✒
मुंबई,दि.17 मे:- काल केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात तोक्ते चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने समोर जात आहे. या दिशेने समोर जात असतांना महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही याचा मोठ्या परिणाम जाणवत आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यायासह जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या होत्या. चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.