अतिवृष्टी नुकसान पंचनामा प्रक्रियेला वेग* *अतिवृष्टीग्रस्त विमाधारक शेतक-यांचे अर्ज तत्काळ भरून घ्यावे :पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश*

*अतिवृष्टी नुकसान पंचनामा प्रक्रियेला वेग*
*अतिवृष्टीग्रस्त विमाधारक शेतक-यांचे अर्ज तत्काळ भरून घ्यावे :पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश*

अतिवृष्टी नुकसान पंचनामा प्रक्रियेला वेग* *अतिवृष्टीग्रस्त विमाधारक शेतक-यांचे अर्ज तत्काळ भरून घ्यावे :पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश*
अतिवृष्टी नुकसान पंचनामा प्रक्रियेला वेग*
*अतिवृष्टीग्रस्त विमाधारक शेतक-यांचे अर्ज तत्काळ भरून घ्यावे :पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

अमरावती, दि. 20 : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व विमाधारक शेतक-यांचे अर्ज भरून तत्काळ भरून घ्यावेत. त्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने पीकविमाधारकांच्या याद्या सर्व गावांतील कृषी सहायकाला पुरवाव्यात जेणेकरून एकही नुकसानग्रस्त शेतकरी बांधव वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

विमा कंपन्यांचे ‘लॉस ॲसेसर’ तत्काळ नेमा

ढगफुटीसदृश अतिवृष्टी झालेल्या गावांतील शेतकरी बांधवांना भरपाई मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत. तसेच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी शेतक-यांना तत्काळ भरपाई मिळणे आवश्यक आहे. यासाठी अधिक्षक कृषी अधिका-यांच्या लॉगिन आयडीवरून पीकविमाधारकांच्या याद्या कृषी सहायकाला द्याव्यात. विमा कंपन्यांनी अद्यापपर्यंत नुकसान निश्चिती करण्यासाठी ‘लॉस ॲसेसर’ नेमले नाहीत. ते तात्काळ नेमून शेतकऱ्यांचे क्लेम तात्काळ निकाली काढण्याची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पंचनामा प्रक्रियेला वेग

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त परिसरातील घऱांचे पंचनामे करण्यात आले आहेत. शेतीचे पंचनामेही तत्काळ पूर्ण करून भरपाईसाठी आवश्यक प्रस्ताव जिल्हापातळीवर पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित ठिकाणी कार्यवाही होत आहे. शेतीनुकसानीच्या पंचनाम्यांनाही सुरुवात झाली आहे.

भातकुली तालुक्यात साऊर, रामा येथील घराच्या पडझडीबाबत पंचनामे पूर्ण करण्यात आले. याठिकाणी साधारणत: पावणेदोनशे घरांत पाणी शिरून नुकसान झाले. पंचनाम्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर यादी तयार करण्यात आली आहे. साऊर, रामाबरोबरच पूर्णानगर, खोलापूर, आसरा व आष्टी सर्कलमधील काही गावात अतिवृष्टी झाली. शेतीचे पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली. अमरावती तालुक्यातही ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन, शिराळा यासह वलगावचा काही भाग, नवे अकोला आदी ठिकाणी पंचनाम्यांद्वारे नुकसानीच्या नोंदी घेण्यात येत आहेत. घरांच्या पंचनाम्याची प्रक्रियाही होत आहे, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

ग्रामस्तरीय अधिका-यांकडून संयुक्त पंचनामे

शेतीचे पंचनामे ग्रामस्तरीय अधिका-यांकडून संयुक्तपणे होत आहेत. ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. शेतीतील नुकसानीची तपशीलवार नोंद घेण्याबाबत कृषी सहायकांना सूचना देण्यात आल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

शेतकरी बांधवांच्या संवाद साधून प्रत्येक नुकसानीची अचूक दखल घ्यावी. एकही पात्र व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये. यासाठी पंचनाम्यातील नोंदी अचूक असाव्यात. पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर दिले आहेत.