*शिवसेने तर्फे एटापल्ली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात हल्ला बोल*
*जाहीर माफी मागावी व केंद्रीय मंत्रीपदाची राजीनाम्याची केली मागणी*

*जाहीर माफी मागावी व केंद्रीय मंत्रीपदाची राजीनाम्याची केली मागणी*
*/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/*
*एटापल्ली:-* शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने एटापल्लीतील मुख्य चौकात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विलास जी कोडप,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख व माजी जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावार यांच्या नेतृत्वात निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदविले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करतांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी जीभ घसरवून एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने आम्हा शिवसैनिकांचे भावना दुखावले असून नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी तीव्र व एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिले आहे.
निदर्शने करतांना शिवसेना एटापल्ली तालुका प्रमुख मनीष दुर्गे,युवा नेते राघव सुलवावार,शाखा प्रमुख दिपक दत्ता,शिवसेनेचे अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम,प्रफुल्ल येरणे,अहेरी विधानसभा महिला संघटिका पोर्णिमाताई इष्टाम,तुळजाताई तलांडे,महेंद्र सुलवावार, मनीष इष्टाम,दिलीप सुरपाम,इशांक दहागावकर,राहुल कुळमेथे,तनुज बल्लेवार,राजेश हजारे, शुभम डोमलवार,गौरव पेटकर,हेमंत गावडे,रोहित घोष,निहाल कुंभारे,सागर कुलयेती,सचिन कोतरांगे,उमेश मडावी,प्रसंजीत करमरकर,प्रसाद दासरवर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*जनआशीर्वाद नव्हे जनभावना दुखावण्याची यात्रा* :- रियाज शेख
केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरू केले असून त्या दरम्यान महाड येथे पत्रकार परिषदेत आमचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री तथा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह व चुकीचे वक्तव्य करून केवळ आम्हा शिवसैनिकांचे नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री असल्याने मुख्यमंत्री पदाच्या रूपाने राज्याचे जनतेचे भावना दुखावले असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जनआशीर्वाद नव्हे तर जनभावना दुखावण्याची यात्रा असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी म्हटले आहे.