किरीट सोमय्यानां भिंती आड लपविणे,म्हणजे भ्याडपणा…डॉ गुलवाडे! हे तर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन,ठाकरे सरकारवर भाजपाचा ठपका

53

किरीट सोमय्यानां भिंती आड लपविणे,म्हणजे भ्याडपणा…डॉ गुलवाडे!

हे तर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन,ठाकरे सरकारवर भाजपाचा ठपका

किरीट सोमय्यानां भिंती आड लपविणे,म्हणजे भ्याडपणा...डॉ गुलवाडे! हे तर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन,ठाकरे सरकारवर भाजपाचा ठपका
किरीट सोमय्यानां भिंती आड लपविणे,म्हणजे भ्याडपणा…डॉ गुलवाडे!
हे तर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन,ठाकरे सरकारवर भाजपाचा ठपका

जिजा गुरले चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की , राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल हे कारण पुढे करून,भाजपा जेष्ठनेते माजी खा.डॉ किरीट सोमैया यानां दौऱ्या दरम्यान ठाकरे सरकारने चार भिंतीआड दडविण्याचे धोरण आखले. संकटापासून वाचविण्याची ही युक्ती म्हणजे पळ काढणेच होय. अशा अश्या प्रकारामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, असा आरोप महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी सोमवार(20 सप्टेंबर)ला एका प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
ठाकरे सरकार सर्व मोर्च्यावर अपयशी ठरले आहे.भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देणे आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारने हे तालिबानी धोरण झाले.आपले अपयश झाकण्याचा हा केविलवाणा आहे.कोरोना संकटाचा सामना न करता ठाकरे सरकारने जनतेस घरात बसवून वेठीस धरले. कोरोना काळात राज्यातील आरोग्य व्यवस्था ढासळली. हीच स्थिती शिक्षणाची झाली. आता कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यासाठी ठाकरे सरकारने पुढाकार घेतला आहे, हेच डॉ किरीट सोमैय्या यांच्यावरील कारवाईवरून स्पष्ट होत आहे. अपयश झाकण्याकरिता दडपशाहीचे तंत्र ठाकरे सरकार वापरत असल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. निर्णयाची कोणतीही क्षमता नसल्यामुळे व प्रश्नच दडपण्याच्या धोरणामुळे ठाकरे सरकारने जनतेला असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर नेऊन सोडले तर गुन्हेगारांना या सरकारने मात्र मोकळीक दिली आहे.सोडले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडणीप्रकरणी कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी लपूनछपून वावरावे लागत असून या प्रकरणी पोलिसांचा वापर केल्याच्या आरोपामुळे पोलीस दल बदनाम झाले आहे. देशाच्या सुरक्षिततेला आव्हान असलेल्या अतिरेकी कारवायांचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत असताना राज्याचे पोलीस दल मात्र, डॉ सोमैय्या यांच्यावरील अनैतिक कारवाईसाठी बळ वाया घालवत आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असून संजय राठोड नावाच्या मंत्र्यामुळे सरकारची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्यांमुळे सरकारच्या प्रतिमेचे वाभाडे निघत असताना त्यांनाही पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघडी पडली आहेत, आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. यामुळे अस्वस्थ असलेले पक्षाचे कार्यकर्ते सरकारी पाठबळावर पोलिसांदेखत हाणामाऱ्या करीत असून कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडवत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा घटना रोखण्याऐवजी, ज्यांना त्यापासून धोका आहे त्यांनाच ताब्यात घेत, असे प्रकार रोखण्याची हिंमत नसल्याचीच कबुली ठाकरे सरकार देत आहे, असा आरोपही डॉ गुलवाडे यांनी केला आहे. सूडबुद्धीने कारवाया करून ठाकरे सरकारने राज्यात आणीबाणीहूनही भयानक अशी तालिबानी राजवट सुरू केली आहे. जनतेच्या मनात संताप खदखदत आहे. सरकारने वेळीच जागे व्हावे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याऐवजी सत्याला सामोरे जाऊन कारवाईची हिंमत दाखवावी.भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत असून ही लढाई निर्णायक शेवटापर्यंत लढली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकात दिला आहे.