जळगांव जिल्ह्यातील राजकीय पक्ष; संघटनांच्या वतीने २७/सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन

मीडिया वार्ता न्युज
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विशाल सुरवाडे
जळगांव जिल्हा बंदचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देश बुडव्या धोरणाच्या विरोधात 27 सप्टेंबर 2021 सोमवार रोजी भारत बंद करण्याचे बुलंद हाक दिली आहे. राज्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस;राष्ट्रवादी;शिवसेना , मार्क्सवादी कम्युनिट पक्ष; इत्यादी राजकीय पक्ष व सर्व पुरोगामी संघटनांनी बंदचे आवाहन केलेले आहे. जनविरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे ३ कृषी कायदे व ४ श्रम संहिता रद्द करा; विज दुरुस्ती विधेयक मागे घ्या; संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव शेतकऱ्याना मिळावा यासाठी केंद्रीय कायदा करा; खाजगीकरणाचे धोरण बंद करा; डिझेल;पेट्रोल; गॅस इत्यादीचे भाव वाढ कमी करा;नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा;लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे रक्षण करा इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आपणही जळगांव जिल्हा बंद चे आवाहन केलेले आहे. तेव्हा शेतकरी;कामगार; दलित;आदिवासी; शेतमजुर;कर्मचारी; विदयार्थी;शिक्षक;महिला आदींनी मोदी सरकारच्या विरोधात बंद पुकारलेला आहे.तेव्हा जळगांव जिल्ह्यातील जनतेने या भारत बंद मध्ये स्वयंपूर्तीने सहभाग घ्यावा असे आवाहन महाविकास आघाडी; महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा; माकप;भाकप;प्रहार जनशक्ती पक्ष; छावा मराठा युवा महासंघ; संविधान जागर समिती ; पुरोगामी संघटनांनी केलेली आहे. मुकुंद सपकाळे -प्रदेशाध्यक्ष -महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा; अशोक लाडवंजारी-मा.नगरसेवक; राजू मोरे -मा. नगरसेवक; अमोल कोल्हे जिल्हाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ , संविधान जागर समिती संयोजक-भारत ससाणे;कादरीया फाऊंडेशन- फारुख कादरी; कॉ.विजय पवार , निलेश बोरा-युवक अध्यक्ष-प्रहार जनशक्ती पक्ष