भाजपा किसान मोर्चाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन

विनायक सुर्वे प्रतिनिधी

वाशिम:- भाजपा किसान मोर्चाने वाशिम जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रत्यक्ष शेतकयांच्या वाळू घातलेल्या सडक्या सोयाबीनचे नमुने पाठवून केली मदतीची मागणी.

मदत न मिळाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा भारतीय जनता पार्टी व भाजपा किसान मोर्चाचे वतीने भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा दिला इशारा मं.पीर उपविभागीय अधिकारी यांना आंदोलनाचे निवेदन देते वेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र ठाकरे, शहरध्यक्ष श्यामभाऊ खोडे,पं.स.सदस्य अतुल गायकवाड व विलास गायकवाड, नंदकिशोर पावसे, अनिल गावंडे पार्डीकर किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महादेवराव परांडे सह शेतकरी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here