राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा केला जातो

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भवन लिल्हारे
मोहाडी तालुका पत्रकार
📱८३०८७२६८५५ 
📞 ८७९९८४०८३८

मोहाडी :- दिनांक २८ फेब्रुवारी १९२८रोजी भारतीय भौतिकवादी सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा केला जातो.भारतात शास्त्रीय, शेक्षनिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये विद्यापीठे,शिक्षनिक संस्था, शास्त्रज्ञ,संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.

काही दिवसापूर्वी भारताने संपुर्ण जगाचे लक्ष वेधण्याचा काम करुन दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. २१ वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणास दिसत आहे. नवनवीन यंत्रे,तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहे. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.

आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे शुध्दा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरण आहे.आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे.

हे आपण वाचलंत का?

१९९९ पासुन भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञाना मधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करु शकतो. आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करु शकतो. १९९९ मध्ये आपले विश्व बदलणे हि संकल्पना २००४ मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती हि संकल्पना तर २०१३ मध्ये मॉडिफाईड पिके व अन्न सुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला.

चालू वर्षामध्ये ‘ खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हि संकल्पना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाला अनेक ठिकाणी चांगले संभाषण,विविध संशोधने शास्त्रज्ञांची चर्चासत्रे अशा अनेक कार्यक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.

आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला आहे.नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे, उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतिशील साधन मिळाले आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक चांगला फायदा होतो आहे.

https://www.instagram.com/p/CaKTeIpK2Fd/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.

आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत,. त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत. आणि आपण भविष्यात काय घडऊ शकतो हे सुध्दा विज्ञानचं ठरवू शकते.भारतीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here