बिनडोक मराठी तरुणांनो, कडू आहे पण सत्य आहे
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
लेख :-
राज ठाकरे बोलले, लगेच गेला टोलनाका अड्वायला
उद्धव ठाकरे बोलले, चालला मराठी म्हणून बस फोडायला
शरद पवार बोलले, लागला पुरंदरेला शिव्या द्यायला
बी जे पी वाला बोलला चालला गो माता गो माता करायला
राहुल गांधी बोलला लागला रस्त्यांवर पळायला,
ह्यांची मुले स्टडी रूममध्ये
तुम्ही कस्टडी रूममध्ये
ह्यांची मुले अमेरिका, युरोपात
तू दही हंडीच्या कळपात
ह्यांची मुले उच्चपदस्थ,
तू एका क्वॉर्टर एवढा स्वस्त.
त्यांची मुले इंजिनियर,
तू पितो किंगफिशर बीअर
त्यांच्या मुलांना पाच आकडी पगार,
तू हंगामी बेरोजगार
ज्या मेहनतीने पंजाबी, गुजराती, मारवाड्यांची मुले CA, CMS, BMS, BBA, MBA ची तयारी करतात
उत्तर भारतातील मुले UPSC, RAILWAY ची तयारी करतात
दक्षिण भारतातील मुले IT, IIT, Medical ची तयारी करतात
त्यांच्यापेक्षा अधिक मेहनत आमची महाराष्ट्रातील मुले …
शिर्डी पदयात्रा, दही हंडी, गणपती, नवरात्रीची करतात, वेळ अन वय निघून गेल्यावर आई बाबावर खापर फोडतात
ज्या वयात चांगले अधिकारी होण्यासाठी शिक्षण घेण्याची जी वेळ असते…….
तेंव्हा आमचा तरुण कुठल्यातरी मंडळाचा अध्यक्ष,
पक्षाचा तालुकाध्यक्ष, युवाध्यक्ष, शाखाध्यक्ष किंवा कार्यकर्ता असतो……..आणि नंतर बेरोजगार..
आता नको पवार, नको ठाकरे, नको मोदी, नको सोनिया..
तुम्ही मेलात तरी कोणाला काही फरक पडत नाही.
जगा फक्त तुमच्या आई-बापा साठी, समाजासाठी, आणि स्वत: साठी.
तरूणांना तसेच प्रत्येक व्यक्तीलाच विचार करायला लावणारी पोस्ट आहे सर .
कडू आहे..पण सत्य आहे