कर्जाला कंटाळून उमरीच्या युवा शेतकऱ्याने घेतला गळफास.

समुद्रपूर :- सततच्या नापिकीसह कर्जाला कंटाळून उमरी (कोरा) येथील युवा शेतकरी विनोद उर्पâ बालू नामदेव देठे याने शेतातील गोठ्यातच गळफास लावून घेत आज ता. 27 रोजी सकाळी आत्महत्या केली. विनोद देठे आज सकाळी शेतातील काम करण्यास शेतात गेला होता.त्यानंतर काही वेळाने त्याचे आई आणि वडील शेतात गेले असता त्यांना विनोदने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे दिसले. विनोद घरचा कर्ता होता. वडील नामदेव देठे यांच्या नावाने असलेली शेती तो कसत होता तसेच घरचा कर्ता होता. वडिलांच्या नावाने असलेल्या शेतीवर बँकेचे 1 लाख रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय वेळोवेळी शेतीकामाकरीता त्याने नातेवाईकांकडूनही पैसे उधार आणले होते. पण तसेच सततच्या नापिकीमुळे आपण आपल्या परिवा-याची उपजीविका कशी करणार, कर्जाची परतपेâड कशी करणार, या विवंचनेत तो सातत्याने राहात होता. अखेर त्याने गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला. मृत विनोद देठे यांच्यामागे आई,वडील,पत्नी आणि दोन लहान मुली, असा मोठा परिवार आहे. घटनेची नोंद गिरड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here