बाबुपेठ रेल्वे गेट जवळ धुळीचे साम्राज्य
रेल्वे कंत्राटदार (ठेकेदार ) खेळत आहे लोकांच्या जीवाशी
✍🏻मनोज एल खोब्रागडे✍🏻
सह संपादक दैनिक मीडिया वार्ता न्यूज मो. 8208166961
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की कित्येक वर्षाच्या कालावधी नंतर कित्येक लोकांचे उपोषण, आंदोलन, मोर्चे व बाबुपेठ वासियांच्या प्रयत्नाने बाबुपेठ उडानपुलाचे गेल्या चार वर्षांपासून काम सुरु ते आज ही काम सुरूच आहे आणि याच कामाच्या दरम्यान तिसऱ्या रेल पटरी चे काम देखील सुरु आहे आणि याच तिसऱ्या रेल पटरी च्या कामासाठी म्हणून jcb लावून खुदाई चे काम सुरु आहे आणि खुदाई ची माती आठ ते 10 डम्पर (ट्रक ) ने ती माती महाकाली कॉलरी दिशेने रेल्वे च्या कामासाठी नेण्यात येते या दरम्यान जे आठ ते दहा डम्पर (ट्रक ) जे माती नेण्यासाठी आहेत ते रेल्वे गेट जवळील टरनिंग वर मोठया प्रमाणात धुळ निर्माण होते आणि रेल्वे गेट जे पाच पाच मिनिटांनी बंद होते आणि गेट बंद असल्यामुळे तेथे जी लोकांची अफाट गर्दी होते व तेथे जमा झालेल्या अफाट विषारी धुळी मुळे कित्येक लोकांची तबेत खराब होत या परिसरात राहणाऱ्या लोकांची व येथील व्यापारी, लहान मोठे दुकानदाची सुद्धा तबेत खराब होऊन राहिली आहे आणि लोकांच्या तबेती खराब व्हायला नको म्हणून रेल्वे गेट जवळील लोकांनी तेथील सुपरवाईजर ला कित्येकदा त्या धुळी साठी पाणी मारण्याची विनंती देखील केली परंतु त्या सुपरवाईजर ने आज उदया करून अजून ही पाणी मारून राहिला नाही आणि लोकांच्या गोष्टी कडे कानाडोळा करत आहे आणि आता तर ती संपूर्ण धूळ रोडवर आली आहे त्यामुळे अपघाताला निमंत्रण सुद्धा मिळाले आहे काही दिवसापूर्वी तर एक बाईक वरून एक तरुण व तरुणी डम्पर च्या चाकाखाली येता येता वाचले त्याची टू व्हीलर बाईक चा सायलेंसर पूर्ण तुटण्याच्या अवस्थेत झाला होता रोडवर पडणाऱ्या धुळी मुळे कित्येक लोकांच्या टू व्हीलर बाईक स्लिप होऊन लोक त्या ठिकाणी पडत आहेत पण त्या कंत्राट दाराला व त्यांच्या सुपरवाईजर काही एक लेणंदेणं राहील नाही ते आपलं काम सर्रास व जोरात करत आहेत त्यांना लोकांच्या जीवाशी काही फरक पडत नाही असच दिसून येत आहे.
या परिसरातील लोकांना तर त्या धुळीमुळे जीवावर चे झाले आहे या परिसरातील लोकांच्या घस्यात या धुळी मुळे आवाज बदलून दुखायला पण लागले आहे जर लवकरात लवकर या धुलीचा विल्हेवाट लवण्यात आले नाही तर या परिसरातील लोकांना धुळी मुळे जीव गमवावा लागेल यात शंकाच नाही.
या बातमी च्या माध्यमातून प्रशासनाला व महानगर पालिका आयुक्त साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या कंत्राटदार चे काम बंद करावे जोपर्यंत त्या रोडवरील धूळ साफ व तेथे दिवसातून तीन वेळा टँकर ने पाणी मारणार नाही तोपर्यंत व या धुळी साठी काही तरी उपाय योजना केल्या शिवाय कामाची परवानगी देऊ नये अशी या परिसरातील जनता निवेदनातून मागणी करणार आहे.