तळोधी वनपरिक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू

तळोधी वनपरिक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू

तळोधी वनपरिक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू

तळोधी वनपरिक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 20 मे
गोंदिया-बल्लारशाह रेल्वे रुळालगत रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 19 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत येणार्‍या तळोधी वनपरिक्षेत्रातील तळोधी नियतक्षेत्र गंगासागर हेटी बिट कक्ष क्रमांक 90 मध्ये उघडकीस आली. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे.नागभीड येथून चंद्रपूरकडे जाणार्‍या रेल्वे इंजिनच्या धडकेने घटना घडल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी, स्वाब संस्थेचे सदस्य
घटनास्थळी पोहोचले. मो क्का पंचनामा करून रात्री दोन वाजता तिन्ही मृत चितळांना वनविभागाच्या सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणले. सोमवार, 20 मे रोजी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली. यापैकी एक दीड ते दोन वर्षे वयाचा तर दोन चितळ अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे वयाचे असून, त्यापैकी एक चितळ हे
गर्भावस्थेत असल्याचे तपासणीअंती वनाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी तळोधी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, तळोधीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने,
वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाळ, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, जिवेश सयाम सदस्य सर्पमित्र, व इतर सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे, गोंदिया – बल्लारशाह रेल्वे लाईन ही ताडोबा आणि ब्रह्मपुरी वन विभागाच्या जंगलामधूनच गेलेली असल्यामुळे या मार्गावर सतत वन्यजीव मृत पावल्याच्या घटना घडतात. यामध्ये चिचपल्ली- मुल- नागभीड- तळोधी – सिंदेवाही या
परिसरामध्ये वाघ, अस्वल, बिबट आणि सांबर, चितळ,
नीलगाय, रानगवा, अशा पद्धतीचे वन्यजीव सतत मरत
असतात. त्यामुळे जंगलातून चालणार्‍या रेल्वेची वेग मर्यादा ही कमी असावी. तसेच दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जाळीचे कुंपण केलेले असावे जेणेकरून या प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाही, सोबतच रेल्वे विभागावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यायला हवा. जेणेकरून अशा दुर्दैवी घटना कमी करता येतील, असे मत ’स्वाब नेचर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर यांनी व्यक्त केले.