शिक्षकांकडे अनेक कामे ;निराक्षरांचे सर्वेक्षण करायचे कसे?

शिक्षकांकडे अनेक कामे ;निराक्षरांचे सर्वेक्षण करायचे कसे?

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी (योजना) नुकतीच सूचना जारी केली आहे. परंतु शिक्षकांकड अनेक प्रकारची कामे असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबर आता निरक्षराचे सर्वेक्षण करायचे कसे, असा प्रश्र शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.
केंद्र शासनाने निरक्षरांना साक्षर करण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रय उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाते आणि त्यानंतर त्यांत साक्षर केसे जाते. याबाबत ९ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्राच्या शिक्षण संचानालयाने (योजना) शाळाबह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबर आता निरक्षरांनाही सर्वेक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षकांना निरक्षर व्यक्तीची नोंदणी उल्लास मोबाईल अॅपवर करायची आहे. शिवाय, अध्यापनही करायचे आहे. राज्यातील सर्व शाळांची दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण याबरोबाच निरक्षरांचे सर्वेक्षण करावे, असे सूचनेत म्हटले आहे. अशैक्षणिक कामे कोणती याची माहिती २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयात दिली आहे.
तरीही शिक्षकांना अध्यापणाऐवजी इतर कामात गुंतवले जाते, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीने म्हटले आहे. पाचवी, आठवीच्या अनुतीर्णांची परीक्षा घ्यायची कधी? पाचवी आणि आठवीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे शासन निर्देश असल्याने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या कधी?, असा नवा पेच शिक्षकांपुढे आहे. शिक्षण विभागाने यंदा राज्यभरात एकसमान परीक्षा वेळापत्रक जारी केल्याने ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पहिली हे नववीच्या वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहेत.
२५ एप्रिलला परीक्षा संपल्यावर अवघ्या पाच दिवसांत १ कोटी १७ लाख विद्यार्थ्यांचा निकालही द्यायचा आहे. पाचवी, आठवीत जी मुले अनुत्तीर्ण होतील, त्याच्या परीक्षा, त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग घेणे, उपचारात्मक अध्ययन करणे ही सर्व कामे कधी करायची? अनेक योजना संमलबजावनिसाठी शिक्षकांवर लादल्या जात आहेत. नेमके शिक्षकांनी करायचे काय? विकास कोणाचा साधायचा. असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय कोंबे यांनी उपस्थित केला आहे.

*कोणतेही वेगळे काम दिलेले नाही : शिक्षण संचालक*
शिक्षकांना कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही. दरवर्षी शाळेत कोणते विद्यार्थी दाखल करून घ्यावेत, याबाबतचे दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षन हे नियमित होतच असते. त्यासोबतच असाक्षर व्यकींचे सर्वेक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.