तुलाना या गावात जिंवत विद्युत तार तुटून लागली, आग तनशीचा ढीग व शेतीचे अवजारे जडुन खाक.
संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- तुलाना या गावातील मारोती टेकाम यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत खांबाचा जिंवत विद्युत तार तुटून शेतात असलेल्या तनशीच्या ढगावर पडला व त्यामुळे तनिस व शेतीचे अवजारे जडुन खाक झाली,
आधिच शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला असून, महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकर्याला आत्महत्या वाचुन दुसरा पर्याय उरला नाही, वर्षभरासाठी गुंराच्या पोटापाण्या साठी जमा केलेला चारा जडुन गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तरी या प्रकरणाकडे माननिय तहसीलदार तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिडवुन देण्यासाठी सहकार्य करावे, व हेटकाॅटरला असणार्या जनमित्राला जाॅब विचारुन योग्य ति कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त तुलाना येथील गावकरी करीत आहेत