अंबरनाथ प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या.

अंबरनाथ :- एक महिन्यांपूर्वी विवाहित महिला व तिच्या प्रियकराचा मृतदेह इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये आढळला होता. दोघांचेही गळे इलेक्ट्रिक ग्राइंडरने कापलेले आढळले होते. पोलिसांच्या तपासानुसार प्रियकराने अगोदर प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी यासंदर्भात प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथमधील एका खासगी कंपनीमध्ये अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. यामुळे अजितची पत्नी जयंती व संदीप यांच्यात जवळीक निर्माण होऊन त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. जयंती 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती अजितने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली होती. 18 नोव्हेंबर रोजी संदीप राहत असलेल्या आनंदनगरमधील प्रसादम या गृहसंकुलातील एका फ्लॅटमध्ये संदीप आणि जयंतीचा मृतदेह आढळून आला.

वादातून घडले कृत्य
संदीपच्या घरच्या मंडळींनी त्याचे दुसरे लग्न ठरविले होते. ही गोष्ट जयंतीला कळल्यानंतर ती संदीपला भेटायला घरी गेली. संदीपच्या लग्नावरून दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात संदीपने जयंतीचे डोके जमिनीवर आपटले, नंतर इलेक्ट्रिक ग्राइंडर सुरू करून तिचा गळा कापला. रक्तस्राव झाल्यामुळे जयंतीचा जागीच मृत्यू झाला. नंतर संदीपने स्वतःचा गळाही ग्राइंडरने कापून आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here