यवतमाळ जिल्हात चारचाकी कारचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू.
✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒
यवतमाळ,दि.18 एप्रिल:- यवतमाळ जिल्हात एक भीषण अपघात झालीची बातमी समोर आली आहे. त्या अपघातात 3 लोकं मृत्यू झाले अशी माहिती समोर आली आहे.
यवतमाळ जिल्हातील यवतमाळ – पांढरकवडा मार्गावरील पारवा गावाजवळ चारचाकी गाडी झाडावर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथील चार लोकं यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरून आपल्या चारचाकी कार या गाडीतून प्रवास करत होते. मात्र पारवा गावाजवळ त्यांची गाडी एका भल्यामोठ्या झाडाला धडकली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हा अपघात नेमका कसा झाला, याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच गाडी झाडावर जाऊन आदळली आणि ही दुर्घटना घडली, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आता पुढील कार्यवाही सुरू आहे.