मुंबईच्या पालघरमधील एका घरात मांत्रिकासह 50 लोकं करत होते अस काही.
पोलिसांनी छापा टाकून केलं 27 जणांना अटक.
✒नीलम खरात, प्रतिनिधी✒
पालघर :- मुंबईतील उपनगर असलेल्या पालघर जिल्ह्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोरोना वायरसच्या या महामारीत अस काय सुरु होते त्या घरात सर्वीकडे चर्चेचा वाव फुटले. या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये एका मांत्रिकासह अनेकांना अटक केली. या ठिकाणी आजारी लोक बरे होण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली.
विक्रमगड तहसीलच्या सकतोर गावातील एका घरात शुक्रवारी दुपारी पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. पोलिसांनी याबाबत सांगितले, की त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 25 लोकांनी मास्क लावला नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडून 12,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी घरावर छापेमारीची कारवाई केली. त्याठिकाणी काळ्या जादूटोणासारखे प्रकरणे दिसत होती. घटनास्थळी महिलांसह 50 लोक एकत्र होते.
दरम्यान, छापेमारी सुरु असताना अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी मांत्रिक आणि घरमालकासह 27 लोकांना पकडले. पोलिसांनी मांत्रिक आणि घरमालकाला नंतर अटक केली. पण इतक्या मोठ्या प्रमाणात काय सुरु होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.