वर्धा जिल्हातील लाॅकडाउन शिथील करा: वंचित नेते डाॅ. उमेश वावरे ची मागणी.

✒️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒️
वर्धा/हिंगणघात:- वर्धा जिल्हात माघील अनेक दिवसा पासून कोरोना वायरसचा प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने संपुर्ण लॉकडाउन लावले आहे. वर्धा जिल्हा संपूर्ण कृषी वर आधारित असुन ग्रामीण लोकांना व मंजूर व ईतर कामगारांना आॅनलाईनचे व्यवहार करणे शक्य नाही. अनेक शेतक-यांच्या भाजीपाला त्यांचा शेतात पडून सडत आहे. त्याना न्याय मिळाला पाहिजे. वेळेवर आणून आपल पोटभरणारे पुष्कळ लोक आहे त्यामुळे त्यानचा वर उपासमारीची वेळ आली आहे.
मार्गदर्शन तत्वे सांगितले आहे त्या नुसार 7 ते 11 पर्यंत सर्व दुकाने व भाजीपाला पेट्रोल पंपु सुरू ठेवा अशे नविन आदेश पारीत करावे अंशी वंचित बहूजन आघाडीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांनी जिल्हा अधिकारी वर्धा श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदन देऊन यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली व लवकरच वर्धा जिल्हातील लाॅकडाऊन शिथील करू अशे सांगण्यात आले व शासनाच्या दिलेल्या गाईड लाईनचे पालन जनतेनी करावे अशे जिल्हाधिकारी यांनी चर्चे अंती बोलल्या. यावेळी निवेदन देताना मनिष कांबळे, राजूभाऊ घोरडे, राजेश खानकूरे, दिलिप कहूरके, जिवनभाऊ उरकुडे उपस्थित होते.