सांगली जिल्हात 30 रुपयांच्या कारणावरून मित्राने केला मित्राचा खून.

✒सांगली जिल्हा प्रतिनिधी✒
सांगली :- सांगलीच्या जिल्हातील जत तालुक्यातील तोळबळवाडी (मुचंडी) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीस रुपये मागितल्याच्या कारणावरून तरुणाचा गळा धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या छातीवर गंभीर जखमा करून मित्रानेच हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अरुण शामू मलमे वय 20 वर्ष असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कन्नड शाळेजवळ मंगळवारी सायंकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत तरुणाचे वडील गुंडा मलमे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. खून केल्याच्या कारणावरून संशयित आरोपी रमेश फकीराप्पा पाटोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार तो फरार आहे.
मुचंडीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तोळबळवाडी येथे मित्र असणारे अरुण मलमे व रमेश पाटोळे राहत होते. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित रमेश हा अरुणला तीस रुपये देण्यासाठी गेला यावेळी दोघांचे भांडणे झाले. यावेळी रमेशने अरुणचा गळा धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारून ढकलून दिले व खाली पडल्यावर रमेशने छतीवर बसून अरुणला जखमी केले. यात अरुणचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून रमेश फरारी झाला आहे. सदर घटना समजताच जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे रमेशचा शोध व अधिक तपास जत पोलीस करत आहेत.