कोरोनाची तिसरी लाट येण्याची शकता, लहान मुलांची विशेष काळजी घ्या, मुख्यमंत्र्याचं आवाहन.
✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.23 मे:- कोरोना वायरसने महाराष्ट्र हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत तर आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडलेले सर्वांना दिसले. पण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत कोरोना वायरस महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता असून लहान मुलांना त्याचा आधिक धोका असल्याचे समोर येत आहे. तज्ज्ञांच्या या सल्ल्यानंतर देशभर तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्र सरकारही यामध्ये मागे नाही. लहान मुलांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याच टास्कफोर्ससह राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. विरोधकांकडून होणारी सतत टीकेची झोड आणि एकंदर कोरोना परिस्थितीची आपल्याला जाणिव असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपली बाजू स्पष्ट केली.
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांनाही धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण पालकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, राज्य सरकारकडून सर्वोस्वी मदत होईल, असं म्हणत मुख्यमंत्री धीर दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, तज्ज्ञांनी लहान मुलांसाठी दिलेले सल्ले पाळा. मुलांवर घरच्याघरी कोणतेही औषधोपचार करु नका. त्यांची काळजी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री यावेळी केलं.