तीन कृषी कायद्याच्या विरोधात काळे झेंडे लावून प्रहारनी पाळला निषेध दिन.

✒️मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒️
हिंगणघात,दि.26मे:- केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी विरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. 26 मे रोजी मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहे शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारच्या निषेध म्हणून आज मोदी सरकारच्या निषेध म्हणून 26 मे रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा, शिक्षण,कामगार व महिला व बालकल्याण राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे सरसेनापती नामदार बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत विदर्भातील सर्व शेतकरी, शेतमजुर व प्रहार सेवकांनी आपआपल्या घरावर व शेतीवर काळा झेंडा लावून निषेध नोंदवला वर्धा जिल्ह्यातही सर्व तालुक्यात प्रहारचे सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख यांनि गावागावात काळे झेंडे लावून निषेध नोंदवला.
यावेळी रुग्णमित्र गजु कुबडे पूर्व विदर्भ प्रमुख व संपर्क प्रमुख वर्धा,नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा यांनी आपल्या निषेध नोंदवत काळे झेंडे लावले.