कर्मयोगी फाऊंडेशनचा अन्न धान्य किट वाटपाचा चौथा टप्पा; बोलते नव्हे तर कर्ते व्हा..
सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर :- चंद्रपूर कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे कोरोना संकटकाळात गरजवंत परिवारांना ५१ क्विंटल अन्नधान्य वाटपाचा जो संकल्प करण्यात आला होता. त्यातील चौथा टप्पा वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त दि. १३ जून २०२१ रोजी आई सभागृह बुटीबोरी नागपूर रवीवारला १०१ आँटो चालक बांधवाना प्रत्येकी ५ किलो गहू व व ५ किलो तांदूळ या प्रकारे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून ऐक सामाजिक बांधीलकी जोपासुन आवश्यक ती मदत करण्यात आली. आजच्या परिस्थिती जी माणुसकी व संताची संस्कृती कर्मयोगी फाऊडेन्शनचे संस्थापक पंकज भाऊ ठाकरे जोपासत आहेत याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. कोरोणा काळातील प्रत्येक गरजवंताच्या पाठिशी उभे पूर्ण टिम आज कार्ये करत आहे .अप्रतिम अशा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावण्यात आले मला मनापासून समाधान वाटले .आजही समाजात पंकज भाऊच्या रुपाने या पृथ्वीवर देवमाणस आहे. आपण सर्व यांच्या पाठिशी उभे रहायला हवे. माझा तर पाठिंबा चांगले काम करणाऱ्या सोबत असतोच. यावेळी अचला ताई मेसन, विकास वांदे, सर्व संघटनेच्या महिला पदाधिकारी अनेक मान्यवर व अँटो चालक बांधव उपस्थित होते.