इथे काही इंचांवर वाट पहातोय मृत्यू!

71

मिडीया वार्ता न्यूज

तुम्ही जर जीटीबी नगरमधल्या ब्रिजवरुन जात असाल, तर सावध रहा. कारण इथे अवघ्या काही इंचांवर साक्षात मृत्यू तुमची वाट पहातोय! काही मिनिटांतच खेळ खल्लास! विश्वास बसत नाहीये ना? आम्ही हे म्हणतोय, त्याला कारणही तसंच आहे. जीटीबी नगरमधल्या पादचारी पुलावर हाय व्होल्टेज विद्युत तारा लटकलेल्या आहेत. ब्रिजच्या दोन्ही बाजूला विद्युत वाहिनीच्या डीपी आहेत. ज्यामधून हजारो व्होल्टचा करंट सतत वाहत असतो. ब्रिजवर लटकणाºया तारा जर खालून जाणाºया पादचाºयांच्या अंगावर पडल्या, तर त्यातून गं•ाीर घटना घडू शकते. शिवाय हा ब्रिज लोखंडाचा आहे आणि लोखंडातून सहज विद्युत प्रवाह प्रवाहित होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी पुलावर उ•या असणाºया सर्वच पादचाºयांना हाय व्होल्ट विजेचा झटका बसून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यातच आता पावसाळा सुरु झाल्यामुळे या ब्रिजवर शॉर्ट सर्किट होण्याचा धोकाही वाढला आहे. मी रोज या ब्रिजवरून ये-जा करतो. गेल्या अनेक दिवसांपासून या वायरी अशाच अवस्थेत आहेत. त्यात आता पावसामुळे वायरचा शॉक कधी लागेल याचीच •ाीती असते

संकेत कांबळे, स्थानिक रहिवासी कुर्ला चुना•ाट्टी या मार्गावरुन जाणाºया रेल्वे रुळाच्या मधोमध हा ब्रिज आहे आहे. मुंबईत पावसाने जोरदार

हजेरी लावली असताना रेल्वेकडून मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अशा प्रकारचा निष्काळजीपणा दाखवला

जात आहे. हा पादचारी पूल रेल्वे जवळील असल्याने प्रतीक्षानगर व सायन या मार्गाला ही जोडतो. त्यामुळे या पादचारी पुलावर मोठ्या संख्येने लोकांची वर्दळ

सुरु असते. त्यात या वायरी अशा प्रकारे लटकणे हा नागरिकांच्या जिवाशीच खेळ असल्याची •ाावना

स्थानिक व्यक्त करत आहेत. विद्युत तारेमधून झालं होतं स्पार्किंग… जीटीबी नगरमधल्या या ब्रिजवरुन जाणाºया तारांमधून दोनच दिवसांपूर्वी स्पार्किंग झाल्याचं स्थानिक सांगतात. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांमध्ये या ब्रिजवरुन जाण्याबद्दल •ाीतीची •ाावना आहे. मात्र अजूनही रेल्वे प्रशासनाकडून या लटकणाºया वायरींबाबत काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. रेल्वे प्रशासनाची उदासीनता आणि आश्वासनं… दरम्यान, ‘मुंबई लाइव्ह’च्या टीमने याचा पाठपुरावा करण्यासाठी जीटीबी रेल्वे स्थानक गाठलं. मात्र, दाद मागण्यासाठी कोणीही रेल्वे अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. तिथल्या रेल्वे कमर्चाºयांकडे या समस्येबाबत विचारणा केली असता, या वायरीचे काम लवकरात लवकर केले जाईल असं रेल्वे कमर्चारी अक्षय कांबळे यांनी सांगितलं.गेल्या अनेक दिवसांपासून या लटकणाºया वायरी अशाच अवस्थेत आहेत. त्याकडे ना रेल्वे प्रशासनाचं लक्ष आहे, ना वीजपुरवठा कंपनीचं. पण प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाचा •ाुर्दंड जर कुठल्या स्थानिकाला पडला, तर त्याची जबाबदारी कोण  घेणार? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही.