खरा शिक्षक दिन कोणता….!

58

खरा शिक्षक दिन कोणता….!

खरा शिक्षक दिन कोणता....!
खरा शिक्षक दिन कोणता….!

भारतात शासन स्तरावर 5 सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीच्या दिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला, त्यांचे शिक्षण होऊन सार्वजनिक जीवनात ते 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात आले.
डॉ. राधाकृष्णन हे सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वीच महाराष्ट्रातील महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या गुलाम भारत देशात 100 वर्षांपूर्वीच प्राथमिक शिक्षण मोफत आणि सर्व समाजासाठी सुरु केलेले होते, त्यासाठी या दाम्पत्यानी शिव्या श्राप, माती, विटा झेलल्या. 1 जानेवारी 1848 रोजी माहात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी आपल्या पारतंत्रात असलेल्या भारत देशात पहिली मुलींची आणि 1852 साली मुलांची शाळा सुरु केली. राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर 40 वर्षांपूर्वी महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी शाळा सुरु केली. आणि सामाजिक सुधाराचे कर्तृत्व आणि तम्माम महिला समाजाला शिक्षणा रुपी पाणा पाजला त्यामूळे स्वाभाविकपणे न्यायाने शिक्षकदिनाचा मान हा महात्मा फुले दाम्पत्याकडे जातो.

महात्मा फुले यांनी स्वतः च्या कुटुंबापासून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जातिधर्मातील मुलींना फुले यांच्यामुळे शिक्षण मिळाले. समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढायचे असेल तर प्रथम मुलींना शिकवा, असे म.फुले म्हणायचे, ते केवळ बोलके सुधारक नव्हते, तर कर्ते सुधारक होते. राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध होते, असे त्यांचे चिरंजीव डॉ.सर्वपल्ली गोपाल सांगतात.(Ref.R asha krishna A Biography-S.Gopal)
महात्मा फुले हे सुधारणावादी, क्रान्तीकारक, पुरोगामी, समतावादी साहित्यिक होते, त्यांच्या साहित्यातून सामाजिक क्रान्ती झाली. त्यांचे साहित्य बहुजनांना आत्मभान देणारे होते. राधाकृष्णन हे वैदिक/सनातनी साहित्याचे लेखक होते. वेदांत, गीता, ब्रह्मसूत्र, क्राईम ऑफ लीला इत्यादी त्यांच्या लेखनाचे विषय होते. ते सनातनी विचारांचे होते.

महात्मा फुले यांचे साहित्य उस्फुर्त साहित्य होते, ती कोणाची कॉपी नव्हती. राधाकृष्णन यांनी एका तरुणाच्या पीएच. डीच्या प्रबंधाचे चौर्य करून तो प्रबंध स्वतःच्या नावावर प्रकाशित केला, तेंव्हा तो तरुण राधाकृष्णन यांच्या विरुद्ध कलकत्ता हायकोर्टात गेला. (संदर्भ-ज्यूं मछली बिन नीर-आचार्य रजनीश, पृष्ठ क्र.170,171) त्यामुळे चोराच्या नावाने शिक्षक दिन साजरा करण्यापेक्षा तो प्रामाणिक महात्मा फुले-सावित्रीबाई यांच्या नावाने साजरा होणे हे आपल्या देशाच्या, शिक्षण खात्याच्या व शिक्षकांच्या दृष्टीने स्वाभिमानाची बाब आहे. याचा आपण सर्वांनी गांमभीर्याने विचार करून अंमलबजावणी करावी.