हजरत टीपू सुलतान फाऊंडेशन गडचांदूर तर्फे आयोजित कार्यक्रम संपन्न
फाऊंडेशनचे अमजद शेख जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

डॉ. भोलेनाथ मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधि
मो. न. 82750 74426
गडचांदूर:- आजचा युवा वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाटचाल करतो आहे. पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो वाईट मार्गाने न वळता वाईट विचारांनी न चालता एक आपल्या हातून आज एखादी तरी आपल्या मित्रांसाठी घरातील लोकांसाठी समाजासाठी आपण आज सार्थक ठरू आपल्या हातून आज चांगलें कार्य घडल का हे तो नेहमी विचार करतो आहे. आणि खरचं आजचा युवा वर्ग हासमाजासाठी उपयोगी पडतो आहे याचा अभिमान आहे. युवा वर्ग एकत्रित येऊन समाजासाठी निस्वार्थ पने कसे कामीं पडेल हाच उद्देश ठेवून दिनांक ४ सप्टेंबर रोजी गडचांदूर या शहरात लॉक डाऊन मध्ये समाजकार्यकर्त्यांनी युवा वर्गानी केलेल्या कार्याची दखल घेत एक सामजिक आढावा बैठक घेउन सामाजिक कार्यात स्वता ला कसे झोकून द्यावे हे अमजद जि शेख यांनी कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन केले.
गडचांदूर इथे हजरत टीपू सुलतान फाऊंडेशन अतिशय कौतुकास्पद निस्वार्थ पने कार्य करीत आहे आणि हे सर्वांना एकजूट करुन समजाकार्यात भाग पाडण्यासाठी रियाज शेख हे अतिशय मेहनत घेत आहे. असे अमजद जी शेख सर यांनी जाहीर केलें आणि त्यांना गडचांदुर ग्रामीण अध्यक्ष पद बहाल करण्यात आले. त्याप्रसंगी कोर कमिटीचे जुबेर आझाद, अमिज शेख, मयूर खान, मकसुद जि शेख, इतर मान्यवर तसेच फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिलक पाटील यांनी केले.