ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे म्हणजे सरसकट ओबीसी समाजाला विकासापासून दूर सारने होय* *भारतीय जनता ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावार यांचे वक्तव्य*

52

*ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे म्हणजे सरसकट ओबीसी समाजाला विकासापासून दूर सारने होय*

*भारतीय जनता ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावार यांचे वक्तव्य*

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे म्हणजे सरसकट ओबीसी समाजाला विकासापासून दूर सारने होय* *भारतीय जनता ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावार यांचे वक्तव्य*
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे म्हणजे सरसकट ओबीसी समाजाला विकासापासून दूर सारने होय*
*भारतीय जनता ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावार यांचे वक्तव्य*

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर :- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे म्हणजे सरसकट ओबीसी समाजाला विकासापासून दूर सारने होय,असे वक्तव्य
भारतीय जनता ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावार यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षण संदर्भात महेश कोलावार यांनी म्हणाले की,ज्या समाजाचा सगळ्यात जास्त मतदान होतो अश्या समाजाच्या आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे हे सरकारला उचित नाही.हा सरसकट ओबीसी समाजावर केलेला अन्याय आहे.खरच सरकारला ओबीसी समाजाची कदर असेल तर हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा.तसेच मागास वर्ग आयोग गठित करुन त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा न्यायालयात सादर करुन ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत मिळवून आणावा.त्यानंतर ओबीसी समाजाचे आरक्षण गृहीत धरुनच निवडणूका जाहीर कराव्या.
कारण दोन वर्षापूर्वी म्हणजेच १३ डिसेंबर २०१९ ला न्यायालयानी निर्देश दिले होते की, राज्यात मागासवर्ग आयोग गठित करून त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा संकलित करुन न्यायालयात सादर करावा पण या आघाडी सरकारनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केला.दोन वर्ष केवळ विनाकारणीभूत वक्तव्य व खोटे आरोप- प्रत्यारोप करत जनतेला दिशाभूल करुन आता माञ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतून दूर सारले.ही अतिशय अन्यायकारक बाब असून या सरकारचा आम्ही भाजपा ओबीसी मोर्चा वतीने जाहीरपणे निषेध करतो,असे वक्तव्य महेश कोलावार यांनी केले.