चंद्रपुर जिल्हात पावसाने वाढवली शेतकऱ्याची डोकेदुखी, बळीराज्या चिंताग्रस्त.
सोयाबीन या पिकांचे अतोनात नुकसान, पिकाला कोंब फूटण्याची शक्यता.
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- चंद्रपुर जिल्हातील शेतकरी परतीच्या पावसाने पुर्णत बेजार झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गोंडपीपरी तालुक्यात मुसळधार पावसाची दमदार सुरवात झाली दर दोन दिवसाआड पाऊस सुरूच आहे. अश्यातच खरीप हंगामात लागवड केलेले सोयाबीन पीक कापण्याची वेळ आली मात्र दर-दोन दिवसाआड पाऊस येत असल्याने सोयाबीन पीक कापायचे कसे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
पावसाचा कहर सुरूच राहल्यास शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक शेतातच उभे राहुन सोयाबीन ला कोंब फुटण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणीला सूरवात केली आहे. सोयाबीन पिकाचे कळप शेतात जागोजागी पडुन आहेत यातच हा पाऊस आला आणि होत्याच नव्हत झालं.