नागपुर जिल्हात राखेनं केली जिवाची राखरांगोळी, फ्लाय ऑशमुळे अनेक गाव होत आहे बर्बाद.

53

नागपुर जिल्हात राखेनं केली जिवाची राखरांगोळी, फ्लाय ऑशमुळे अनेक गाव होत आहे बर्बाद.

नागपुर जिल्हात राखेनं केली जिवाची राखरांगोळी, फ्लाय ऑशमुळे अनेक गाव होत आहे बर्बाद.
नागपुर जिल्हात राखेनं केली जिवाची राखरांगोळी, फ्लाय ऑशमुळे अनेक गाव होत आहे बर्बाद.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9766445348
नागपूर:- नागपुर जिल्हातील अनेक गावातील नागरीकाच्या जिवाची राखेनं राखरांगोळी होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामूळे अनेक गावातील नागरिक भयाखाली जिवन जगण्यात मजबूर आहेत.

नागपुर जिल्हातील कोराडी आणि खापरखेडा येथील विद्युतनिर्मिती प्रकल्पातील राखेनं अनेक गावातील नागरिकांच्या आयुष्याचीच राखरांगोळी केली. असं मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलंय. या विद्युतनिर्मिती प्रकल्पातील परिसरातील 21 गावांपैकी 18 गावे ही फ्लाय ऑश अनेक ठिकाणी साचून राहते. त्यामुळं त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आल्याचं श्रीपाद धर्माधिकारी यांनी सांगितलं. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मंथन अध्ययन केंद्र आणि असर संस्थेनं याबद्दल सर्वे केला होता. विद्युत निर्मिती प्रकल्पाची फ्लाय ऑश (राख) पाण्याचे साठे, घरे, शेतजमिनी, मोकळ्या जागा आणि वाहनांवर साचून राहते. तसेच त्यांचे ऑश पॉण्ड यांच्याद्वारे पाण्याचे स्थानिक प्रवाह आणि कोलार आणि कन्हान नदीमध्ये सांडपाणी थेट सोडले जात आहे. हे सांडपाणी फ्लाय ऑश मिश्रित आहे. भूपृष्ठावर पाणी, भूजल आणि वॉटर एटीम अशा 25 ठिकाणांहून पाण्याचे नमुने जमा करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला.

पावसाळ्यासह प्रत्येक ऋतु मध्ये पाण्याचे जवळपास सर्व नमुने हे ब्युरो ऑफ स्टॅण्डर्ड्सने पिण्याच्या पाण्यासाठी आखलेले निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. वॉटर एटीएममधून (ऑटोमेटिक वॉटर डिस्पेन्सेशन सिस्टिम) मिळालेल्या पाण्याचे नमुने हेच फक्त त्यासाठी अपवाद ठरले आहेत. पाण्याच्या कित्येक नमुन्यांत मर्क्युरी, अर्सेनिक, लिथिअम, अॅल्युमिनिअम इ. विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित पातळीच्या 10 ते 15 पटीने अधिक धोकादायक पातळीच्या वर असल्याचे अभ्यासामध्ये आढळून आले. मानवासाठी ज्ञात विषारी घटकांमध्ये मर्क्युरी हा सर्वाधिक विषारी आहे. यामुळे आर्सेनिकचा संबंध लिव्हर आणि ब्लड कॅन्सरशी आहे. फुफ्फुसाचे आजारही वाढले आहेत.

भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात गढूळपणा, जडपणा, क्षारता आणि डिसॉवल्ड सॉलिड्स (टीडीएस- विरघळलेली घनतत्वं) यांचे अस्तित्व अधिक पातळीत दिसले. त्याचबरोबर अॅन्टीमॉनी, अॅल्युमिनिअम, आर्सेनिक, बोरोन, फ्लुरॉईड, आयर्न, मँगनिज, मॅग्नेशिअम, मर्क्युरी, मॉलिबडेनम, लिथिअम, लेड आणि सेलेनिअम यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आढळले.

आर्सेनिक, कॅडमिअम, क्रोमिअम, लेड, मँगेनीज, मर्क्युरी, सेलेनिअम, कोबाल्ट, कॉपर, निकेल, झिंक, फ्लुरॉईड आणि तेल व ग्रीस असे अनेक प्रदूषक घटक दोन्ही विद्युत निर्मिती केंद्राच्या फ्लाय ऑश मध्ये दिसून आले. फ्लाय ऑश मिश्रित हवा श्वसनाद्वारे ताबडतोब फुफ्फुसापर्यंत पोहचते. त्यावेळी एकीकडे फ्लाय ऑश हे पार्टिक्यूलेट मॅटर (बारीक कणांच्या स्वरुपात प्रदूषण) असल्याने त्रास होतो आणि त्यातील जड धातूदेखील थेट फुफ्फुसात जातात. जेव्हा फ्लाय ऑश पाण्यात मिसळते तेव्हा हेच जड धातू पाण्यात विरघळतात. कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा- पाणी- माती प्रदूषित, पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.