अबब! ४८ तासांत १६० शासन निर्णय!

अबब! ४८ तासांत १६० शासन निर्णय!

अबब! ४८ तासांत १६० शासन निर्णय!
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

भाजपाने घेतला आक्षेप; राज्यपालांकडे केली तक्रार

मुंबई, : – 25 जूनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ४८ तासांत १६० शासन निर्णय काढले आहेत. यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेतला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहीत म्हटले आहे की, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही गेल्या तीन दिवसांत अत्यंत अस्थिरतेची बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तद्नंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची इच्छा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थानसुद्धा त्यांनी सोडल्याचे माध्यमांमधून कळले आहे. दरेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, अशात राज्य सरकारतर्फे अंदाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. १६० च्या वर शासन आदेश ४८ तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्षे निर्णयशून्य असलेले महाविकास आघाडी सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल आणि अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचासुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला आहे. माहिती आहेच की, यापूर्वी पोलिस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे. महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे, असे दरेकरांनी पत्रात म्हटले