संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांचे मालेगांवा शहरात आगमन,
अनेक राज्यातून जैन भाविक आले स्वागताला
आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे मालेगांव येथे आगमन होताच संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगांव
जैन धर्माचे महान संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महामुनीराज प्रथमच वाशीम जिल्ह्यात मालेगांव तालुक्यात आगमन झाले त्यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र जय्यत तयारी सुरू होती,त्याचप्रमाणे राज्यातील अनेक जिल्ह्यातुन जैन भाविकही महाराजांच्या स्वागतासाठी आले होते आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे मालेगांव येथे आगमन होताच संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण होते यावेळी संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजले होते आचार्य श्री विद्यागर महाराज यांचे दि. 8 रोजी शुक्रवार दुपारी 4 वाजता दनदनीत आगमन झाले तेथे हजारो भाविकांनी त्यांचे भव्य स्वागत केले संपूर्ण अभंग भव्य तोरणाने शहरातील ठिकठिकानी कमानी लाऊन सजवण्यात आले आचार्य श्री ज्या रस्त्याने बाहेर पडले त्या रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने उभ्या असलेल्या लोकांनी त्यांचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानले आचार्य श्रीं ची पालखी अकोला फाटा सरकारी पेट्रोल पंप येथे पोहोचली जिथे विद्यासागर महाराज यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत आचार्य श्रीं चे पूजन करण्यात आले यावेळी आचार्य श्री संबंधित भक्तिगीते सादर केली आचार्य श्री महाराजांसोबत 4 दिगंबर जैन साधू होते तीन निर्गंथ एक ऍलकजी *संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महामुनिराज* निरापक श्रमण मुनि श्री 108 प्रसादसागर जी महाराज मुनि श्री 108 चंद्रप्रभसागरजी महाराज मुनि श्री 108 निरामयसागर जी महाराज संघाचे ऐलक श्री 105 सिद्धांतसागरजी महाराज यांचा मंगल विहार शिरपुर येथे ते ज्या रस्त्यावरून आले त्या रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे मालेगांवच्या जैन मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर वाशीम जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या भव्यदिव्य स्वागत कुणालाच झाले नाही दि.8 जुलै रोजी मालेगांव तालुक्यात आचार्य पदारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हे देखील मोठ्या संखेच्या प्रमाणात विशेष म्हणजे या ऐतिहासिक आगमनाची नोंद महाराष्ट्रात रेकॉर्ड असा झाला आहे या वेळी समस्त जैन युवा युवती मंडळ व तसेच जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते त्यांना जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासना कडूनही पुरेसा बंदोबस्त देण्यात आला होता यावेळी हजारो भाविकांनी हजेरी लावली आणि सर्व पक्षांचे राजकारणीही या आचार्य श्रीच्या घेण्याकरीता सहभागी झाले होते✍