पुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी,युवा संकल्प संस्थेचे तालुका चामोर्शी प्रमुख सुरज नैताम यांची मागणी

55

युवा संकल्प संस्थेचे तालुका चामोर्शी प्रमुख सुरज नैताम यांची मागणी

धनराज आर. वैरागडे 

मो.9421527972

गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी 

चामोर्शी : दिनांक १४/०७/२०२१ झालेल्या रात्र मुसळधार पावसामुळे अनेकांचा घरात पाणी शिरल्याने अनेक लोकानचे झाले नुकसान झाले आंबेडकर वार्ड क्रमांक .६ व ८गव्हापुरा वाडॉ मधे येथे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर रोडावर पाणी साचले आहे .अवघ्या रात्रभर मुसळधार पावसामुळे अनेकाचे भारी नुसकान झाले आहे .साचलेल्या पाण्यामुळे परिसरात घान निर्माण झाली आहे . तसेच येथील २-३ लोकांचे घर सुध्दा पडले.

जिवित हानी झाली नसली तरी  प्रशासनाचे दुलक्ष होत असल्याने या परथिति सामना करावा लागत असून याच्या घराचे नगर पंचायत चामोशीँ चे कर्मचारी पाहनी करुन पंचनामे करुन अनेक गरजू लोकाना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी युवा संकल्प ग्रुप चामोशीँ तथा नागरिक करत आहेत.

यावेळी उपस्थित युवा संकल्प ग्रुप शाखा-चामोशीँ प्रमुख सुरज नैताम व सदस्य सुरज चोके शुभम भाडेंकर अंकुल फुलझले अजय भाडेंकर विजय भाडेकर संतोष बंडू बुराडे राहूल चिचघरे तिरुदेव आत्राम रोहित नदेश्वर गौरव सातपुते प्रशिक नदेश्वर ध्रुप चिचघरे यानी सर्वाचा घरोघरी पाहणी केली व त्याचे समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केले याच्या घरी जाऊन ठेट भेट दिली कमलबाई ढाक , लक्ष्मी काटवाले, ईश्वर वाढई , कविता गोलाईत , देवराव नैताम,सुभाष सुधाकर ढाक मशाखेत्री,राजु भाडेंकर,सखूबाई ढाक,भारत वैरागडे,गोपाल नदेश्वर,तुलाराम नदेश्वर,कृष्णाजी चिचघरे,सोमेश्वर आत्राम,तसेच केशव ढाक राजकुमार बन्सोड याच्या घरी नेहमी मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरत असते. यांची घरे अती जीर्ण अवस्थेत असल्या मुळे घरे पडण्याची भिती निर्माण झाली आहे.

या लोकांची परिस्थीती अत्यंत गंभीर असून या लोकांन कडे घर बांधकाम करण्या इतके योग्य पैसे देखील नाही. येथील लोकांन करिता दर वर्षी करा किंव्हा मर अशी परिस्थिती निर्माण होत असते . दर वर्षी नगर पंचायत येथे या परिस्थीती बद्दल माहिती देऊन सुद्धा लोकांना घरकुल योजनेच्या लाभ मिळत नाही .तसेच शासनाकडून कसल्याही प्रकारचि निधी मिळत नाही दुसऱ्या टप्प्याने बघीतले तर रोडच्या चुकीच्या बांधकामामुळे अशी परिस्थीती उद्भवत असते या वार्डा मध्ये रोडाच उंच बांधकाम झाल्या मुळे येथील घरे ही खालावली आहे त्या मुळे नालितील पाणी पास न होऊन तो तिथेच साचून असते त्याचं प्रमाणे त्या मुळे अनेक रोगाची लागण होऊन लोकांची .फजिती होत आहे तरी पण लवकरात लवकर प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 8 या दोन्ही वाडँ क्रमांकाची नगर पंचायत चामोशीँ चे कर्मचारी चारी येऊन पाहणी करुन गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावे अशी मागणी प्रभाग 6-8 याची मागणी केली जात आहेे.

युवा संकल्प ग्रुप चामोशीँ प्रमुख सुरज नैताम यांनी यांनी नगर पंचायत चामोशीँ कर्मचारी येउन पाहणी करुन तात्काळ अतिशय गरजू लोकाना घरकूल योजनेचा लाभ द्यावा वार्डातिल नागरिक करत आहे.