जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने प्रयत्न करावेत..!
सांस्कृतिक विभागाने जनसंपर्कावर भर देण्याच्या सूचना
✍तारा आत्राम✍
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
95116 20282
मुंबई (चंद्रपूर) : – जगातील सर्वात मूल्यवान प्रसाधन म्हणजे हास्य, ते जनतेच्या चेहऱ्यावर फुलविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कार्यरत राहावे असे उद्गार काल आयोजित बैठकीत काढले. विधान भवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाची स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांसंदर्भात तपशीलवार आढावा बैठक काल घेतली.
या बैठकीस सांस्कृतिक कार्य सचिव, सह सचिव आणि या विभागाचे विविध वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा संदर्भात विविध कार्यक्रमांचे तपशीलवार नियोजन शासनाच्या विविध विभागांनी करणे अपेक्षित असून त्याचा पाठपुरावा सांस्कृतिक कार्य विभागाने करायचा आहे. त्यासंदर्भात विविध सूचना अधिकाऱ्यांना केल्या. सांस्कृतिक कार्य विभागाने जनसंपर्कावर भर दिला पाहिजे, या विभागाचे कार्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असेही यावेळी सांगितले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे काम जनतेशी थेट जोडणारे आहे, याचे भान राखावे आणि विभागाने कामाचा वेग वाढवावा असेही निर्देश दिले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासंदर्भात विविध उपक्रम सीएसआर मधून राबविण्यासाठी केंद्रशासनाची परवानगी मिळविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही येवेळी सांगितले.
स्वनाथ फाउंडेशन च्या कार्यक्रमास भेट..!
“एकदा काय झालं ” या चित्रपटाच्या निमित्त आयोजित स्वनाथ फाउंडेशनच्या प्रतिपालकत्व सप्ताह या कार्यक्रमास काल दुपारी भेट दिली. 18 वर्षांवरील अनाथ मुलांना पालक मिळण्यास अडचणी येतात. या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना पालक मिळवून देण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन काम करते. त्यांचे कार्य समाजाला अत्यावश्यक आहे, या मुलांनी स्वतः चे कर्तृत्व फुलवावे, अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त केल्या. या मुलांना काहीही मदत लागल्यास मी मदतीसाठी सदैव उपलब्ध असेन असे आश्वासनही यावेळी या स्वनाथ मुलांना दिले.
यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार व या चित्रपटाचे निर्माते डॉ सलील कुलकर्णी , स्वनाथ फाउंडेशन च्या सौ श्रेया श्रीकांत भारतीय यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.