सरपंचाला भ्रष्टाचार करणे पडणार महागात,राज्य शासनाचा आदेश,
खावी लागणार तुरुंगाची हवा…
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:28/09/2022
रोहा: गाव स्तरावर मानाचे पद म्हणून सरपंचाला म्हत्व आहे.
गाव च्या प्रथम नागरिक सोबत गाव पुढारीही सरपंच आसतो,परंतू गावच्या विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार होत असून त्यात सरपंच केंद्रस्थानी राहत आसलेल्या अनेक तक्रारी आहेत.
या भ्रष्टाचारा मुळे सरपंच पदाची प्रतिमा मलीन होत आहे.या बाबीची दखल घेत शासनाने गंभीर पाऊल उचल्ले आहे.सरपंचानी भ्रष्टाचार केल्यास आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.तसे निर्णय शासनाने घेतला आसुन त्या संदर्भात आदेश ही काढण्यात आले आहे.गावो गावी ग्रामपंचायत कडुन शासकीय योजना राबवत आसताना भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आले आहेत. आशे प्रकार गंभीर स्वरूपाचे असल्याने प्रशासनाने आता फौजदारी कारवाई बरोबर अपहार केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्हात जबाबदार आसणाऱ्या संबंधित सरपंच, ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक,कर्मचारी,
कर्मचारी या पैकी कोणीही आथवा सर्वजण चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधित पंचायत समिती च्या गट विकास अधिकारी यांनी त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे,असे आदेशात नमूद केले आहे.सरपंच ग्रामसेवक व कर्तव्यदक्ष अधिकारी पद्दाधिकारांच्या संगमताने अनेक गावांची वाट लागल्याच्या तक्रारी शासन दरबारी दाखल झाल्या आहेत.
विरोधकानी त्यांचे कितीही भ्रष्टाचार काढले,तरी कारवाई होत नसल्याने आशा महाठगांची फावले आहे. त्याला आता ब्रेक लावणारा निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे.राज्य शासनाच्या विवीध प्रकार चा निधी आता थेट ग्रामपंचायतीला येत आहे,
त्यात प्रामुख्याने वित्त अयोग्याचा विवीध निधी ग्रामपंचायत ला सर्वाधिक मिळत आहे.निधीचा गैरवापर करन्याचे प्रकार वाढत आसल्याच्या तक्रारी ग्राम विकास खात्याकडे प्राप्त झाल्या आहे.या प्रकाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहे. अपहाराच्या रकमेत विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्या बाबत निष्कर्ष काढण्यात आल्यास संबंधित विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच ज्या प्रकारणा मध्ये कोणतीही चौकशी झालेली नाही व आशा प्रकारणी संबंधित पंचायत समिती चे गट विकास अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी एका,
महिण्या,मध्ये पुर्ण करणे अनिवार्य आसल्याचे आदेशात स्पसष्ट केले आहे.