रमाबाई आंबेडकर विद्यालय येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

63

रमाबाई आंबेडकर विद्यालय येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधि

मो:7263907273

स्थानिक रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली येथे६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध,विश्वरत्न परमपूज्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतीमेचे पूजन करून मानवंदना देऊन स्मरण्यात आले.पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण.के.एन.बोरकर अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती शिक्षण प्रसारक संस्था सावली यांचे हस्ते करुन पंचशिल ध्वजाला सलामी देण्यात आली,त्रिशरण ,पंचशिल व बुद्ध वंदना घेण्यात आली.

. प्रा. व्हि.के गायकवाड यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करित असतांनाच मात्र आमच्या याच देशात दुसरीकडे केवळ दलीत विद्यार्थ्यांनी माठातलं पाणी पीले त्यामुळे मुख्याध्यापकासारख्या जबाबदार व्यक्तीकडून बेदम मारहाण करून त्याला जीवानीशी संपवलं,केवळ खालच्या जातीतील व्यक्ती म्हणून, घोड्यावरून वरात काढायला मनाई केली जाते हाच काय आपला पुरोगामी विचारांचा देश? मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातात नव्हतं,पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या येवले येथे घोषणा करून येथील मनुवादी विचारसरणीला १९३५ साली तगडे आव्हान दिले आणि १४ आक्टोबर१९५६ ला सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर तथागत गौतम बुध्दाच्या विज्ञानाच्या कसोटीवर बसणाऱ्या शांती,अहिंसा, बंधूता,न्याय यावर आधारित असणाऱ्या बुध्द धम्म लाखोंच्या उपस्थितीत स्विकारुन दीक्षा दिली,तो हाच दिवस अशोका विजयादशमी,असा मोलाचा संदेश दिला.

      अध्यक्ष स्थानावरुन बोलताना के.एन.बोरकर यांनी आपल्या देशात सुरवातीला मोघल सम्राटांचे राज्य होते त्यानंतर १५० वर्ष इंग्रज राजवट होती चक्रवर्ती राजा अशोक सम्राट यांची राजवट राजेशाही नव्हती,तर खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य प्रस्तापित करून उच्च- नीच असा भेद न करता सर्वांना समान न्याय देण्याची व्यवस्था करणारी होती 

 यावेळी मंचावर संस्थेच्या सचिव.मान.व्हि.सी.गेडाम मॅडम, संचालक .बि.के.गोवर्धन .व्हि.के. .बोरकर,.सौ.सी.आर.गेडाम .यु.एम.गेडाम,.डी.बी.गोवर्धन , आजीव सभासद .कांबळे ,नि.वि. मेश्राम प्राचार्यशेंडे, पर्यवेक्षक.लाकडे, प्र.प्राचार्य पी.जी.रामटेके उपस्थित होते,

याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जी.एन.मेश्राम, व पी .एन कन्नाके तर आभार चौधरी यांनी केले.