भीषण अपघात…अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

अश्विन गोडबोले

चंद्रपूर ब्युरो चीफ

मो: 8830857351

घुग्घुस, 22 जुलै: चंद्रपूर-भद्रावती मार्गावरील ताडाळी येथील नायरा पेट्रोल पंपजवळ दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. करण सुधाकर जुलमे (18, रा. म्हातारदेवी) व यश देवाळकर (रा. कवठाडा, ता. कोरपना) असे मृतकांची नावे आहेत.

घुग्घुस येथून जवळच असलेल्या म्हातारदेवी येथे राहणारा करण जुलमे हा लोणारा जवळील श्री साई अभियांत्रीकी महाविद्यालयामध्ये संगणक अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात, तर यश देवाळकर हा स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकत होता. हे दोघेही मित्र म्हातारदेवी येथून दुचाकीने लोणारा येथील श्री साई अभियांत्रीकी महाविद्यालयात जात होते. यावेळी नायरा पेट्रोल पंपजवळ त्यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. यात दोघेही गंभीर जखमी झाले.

जखमींना अपघातग्रस्त चारचाकी वाहनाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला. मृतक करण जुलमे हा म्हातारदेवी येथील सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती पाटील यांचा नातू आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here